शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:02 PM

"आम्ही 10 वर्षात 70 नवीन विमानतळे, 325 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारले. 18 कोटीहून अधिक लोकांना नवीन गॅस कनेक्शन दिले."

Delhi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. आगामी सहाव्या टप्प्यात राजधानीत दिल्लीतील सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी आज(दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका परिसरात सभा घेतली. यावेळी त्यांनी मद्य घोटाळा आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यावरुन आप-काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा असो, भ्रष्टाचाऱ्यांकडून एक एक पैसा वसूल केला जाईल. ज्याने देशाची लूट केली, त्याला ती परत करावीच लागेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतातील जनतेला काँग्रेस मॉडेल आणि भाजप मॉडेलमधील फरक स्पष्टपणे दिसतोय. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या लोकांकडे पुढचा विचार करण्याची वेळ किंवा क्षमता नाही. या लोकांनी 60 वर्षांपासून भारताच्या क्षमतेवर अन्याय केला. मी तर म्हणेन की, या लोकांनी गुन्हेगारी कृत्येच केली आहेत. 140 कोटींचा एवढा मोठा देश, भारताला आवश्यक तेवढा वेग आणि स्केल भारतीय जनता पक्षाचे सरकारच देऊ शकते," असा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी मोदींनी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ते म्हणाले, "काँग्रेसला दररोज 12 किलोमीटर महामार्ग बांधता आला, तर आमचे सरकारने दररोज सुमारे 30 किलोमीटर महामार्ग बनवत आहे. काँग्रेसला 60 वर्षात जास्तीत जास्त 70 विमानतळ बांधता आले, आम्ही 10 वर्षात 70 नवीन विमानतळ उभारले. काँग्रेसला 60 वर्षांत 380 वैद्यकीय महाविद्यालये बांधता आली, आम्ही अवघ्या 10 वर्षांत 325 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली, काँग्रेसच्या काळात 7 AIIMS होते, आज 22 हून अधिक AIIMS आहेत, काँग्रेसच्या काळात 75 टक्क्यांहून अधिक लोकांकडे नळ कनेक्शन नव्हते, आज 75 टक्के लोकांच्या घरात नळाला पाणी आहे, काँग्रेसने 60 वर्षात 14 कोटींहून कमी गॅस कनेक्शन दिले, आम्ही 10 वर्षात 18 कोटीहून अधिक नवीन गॅस कनेक्शन दिले आहेत." 

यावेळी पंतप्रधानांनी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "काँग्रेसने देशातील एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांचे उच्च शिक्षणातील अधिकार हिरावून घेण्याचे काम केले. काँग्रेसने आपल्या एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांवर किती अन्याय केला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. काँग्रेस सरकारने शांतपणे एक खेळी केली. अचानक जामिया मिलिया विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्था म्हणून घोषित केले, त्यामुळे मुस्लिमांना 50 टक्के आरक्षण लागू झाले," अशी टीका त्यांनी केली.

"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी