शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:48 IST

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांविरोधात दिल्ली विधानसभा निवडणुका लढत आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कमबॅक करण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जात असून, आम आदमी पक्षाचे नवीन सरकार स्थापन झाले की, मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्ली निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. अनेक आश्वासने देत पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा ते करत आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येऊन दिल्लीकरांना काय काय मोफत देणार, याची यादीच ते मांडत आहेत. तर, भाजपा आणि काँग्रेस आम आदमी पक्षावर आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या रणधुमाळीत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री

मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भावाप्रमाणे असून, प्रिय आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार बनत आहे. दिल्लीकर म्हणत आहेत की, भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाल्यावर मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील. तुमचा लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री असेल, तर सगळे अधिकारी फोनवरूनच समस्या, प्रश्न सोडवतील. उपमुख्यमंत्री महोदयांचा फोन उचलणार नाही, अशी हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या लोकांना वीजबिल शून्यावर यायला हवे असेल, त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. वीजबिलाच्या नावाखाली भरपूर पैसे भरायचे असतील त्यांनी भाजपाला मतदान करावे. भाजपावाले मोफत वीज देण्याच्या विरोधात आहेत. भाजपावाले सांगत आहेत की, त्यांचे सरकार आल्यास अनुदान समाप्त करतील. मनिष सिसोदिया यांना तुमच्याकडे सोपवले आहे. जंगपुराचा विकास १० पट अधिक करायचा आहे. जेवढी कामे प्रलंबित आहेत, तेवढी अतिशय वेगाने पूर्ण करायची आहेत, असे सांगत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप