शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 4:37 PM

काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या नरेंद्र मोदींनी आरोपी मंत्र्यांना हटवावे व संसद चालवावी, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  'काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ' आधी आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसद चालवावी' असे प्रत्युत्तर काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे. संसदीय कामकाज सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी त्यांना आपल्या आरोपी मंत्र्यांना हटवावे लागेल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरणासाठी गुरूवारी नोएडामध्ये आलेल्या मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. गेल्या ६० वर्षांपासून देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा असे मोदी यांनी म्हटवे होते.
मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, ' स्वत:च्या अपयशाचे खापर दुस-यांच्या माथी फोडण्यात मोदीजी माहीर आहेत. पण संसदेत विरोधक गोंधळ का घालतात याबद्दल मोदींनी आत्ममंथन करावे आणि विविध प्रकरणात आरोप लावण्यात आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह , परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरूण जेटली या मंत्र्यांना आधी पदावरून हटवावे.'  संसद सुरळीतपणे चालवण्याचे काम सरकारचे असते आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. पण मोदीजी तर सतत बोलत असतात, कोणाचेही ऐकत तर नाहीतच' अशा शब्दांत सूरजेवाला यांनी मोदींवर टीका केली. संसद ही मर्यादा आणि लोकशाहीच्या मूल्यांवर चालत असते आणि तेथे कोणाचाही अंकुश चालत नाही, असेही सूरजेवाला म्हणाले. 
 
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरण समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. लोकांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, वेगवेगळी मते मांडण्यासाठी आपल्याला निवडून दिले असून ते आपले काम आहे. ज्यांना देशातील जनतेने नाकारले, ते आता गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, संसदेचे कामकाज रोखतात. पण देशातील गरिबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे झालेच पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी येत्या नवीन वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याचा संकल्प करावा, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला.