शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:26 AM

‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये तयार होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या येत्या १५ आॅगस्टपासून सुरु करण्याची शेखी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) मिरवीत असली तरी अशी कोणताही देशी किंवा परदेशी लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी उपलब्ध होण्याची शक्यता वाटत नाही, असे सरकारतर्फे संदीय समितीस सांगण्यात आले आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न संसदेच्या स्थायी समितीपुढे या मंत्रालयाचे अधिकारी, जैवविज्ञान विभागाचे वैज्ञानिक व सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी कोरोना साथीची स्थिती व ती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांतील प्रगती याविषयी सविस्तर माहिती दिली.सूत्रांनुसार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीस सांगितले की, भारतात कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस बाजारात येऊ शकेल. लस भारतात किंवा विदेशात विकसित कलेली पण भारतात उत्पादित केलेली असू शकेल. देशाच्या सुरक्षेएवढेच जनतेचे आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, यावर भर देऊन अधिकाºयांनी सुचविले की, ३० हजारांहून कमी किमतीचे व्हेंटिलेटर व अन्य माफक दराची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्याचीही गरज आहे.‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे. या लशीची ज्या इस्पितळांमध्ये चाचणी घ्यायची आहे त्यांना पाठविलेल्या पत्रात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही लस १५ आॅगस्टपासून इस्पितळांना उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता. अनेक वैज्ञानिक व तज्ज्ञांनी या विषयी शंका उपस्थित केली होती.मजेची गोष्ट अशी की, कोरोनावर लस बनविण्याच्या जगभरातील प्रयत्नांचा आढावा घेणारा डॉ. के. विजय राघवन यांनीच लिहिलेला एक वृत्तांत ‘पत्र सूचना कार्यालय’ (पीआयबी) या सरकारच्या प्रसिद्धी संस्थेने गेल्या आठवड्यात प्रसिद्धीसाठी जारी केला होता. त्यातही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असा उल्लेख होता. परंतु ‘पीआयबी’ने ते वाक्य काढून टाकून काही मिनिटांतच नवे प्रसिद्धीपत्रककाढले होते.३० पैकी सहा सदस्य हजरसमितीच्या बैठकीला ३० पैकी फक्त सहा सदस्य उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी अडचणी असूनही हजर राहिलेल्या सदस्यांचे आभार मानले. समित्यांच्या बैठका ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने घेऊ देण्याची विनंती रमेश यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना गेल्या महिनाभरात तीन वेळा केली. परंतु समितीच्या नियमांत बदल करायचे असतील तर त्यासाठी संपूर्ण सभागृहात तसा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सध्या ते शक्य नसल्याने ‘व्हर्च्युअल’ बैठकांना परवानगी मिळू शकलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या