शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

CoronaVirus News : देशात कोरोना चाचण्या कमी; १० लाखांमागे फक्त २००७

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 5:34 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन दर दहा लाख लोकांमागे २.६४ मृत्यू असा दर २१ मे रोजी होता. जगात हा मृत्यू दर सगळ््यात कमी असावा. याशिवाय बाधित रुग्णांचे प्रमाणही युरोप, उत्तर अमेरिका, अफ्रिका आणि इतर देशांच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे सगळ्यात कमी ८६ एवढे आहे. असे असले तरी तज्ज्ञ काळजीत पडले आहेत ते म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे. येथे विकसित देशांचा विचार नाही.

एवढेच काय सगळे आफ्रिकन देश एकत्र केले तर त्यांनीही दर दहा लाख लोकांमागे २०८२ चाचण्या केल्या तर भारताने २१ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडील (आयसीएमआर) माहितीनुसारदर दहा लाख लोकांमागे चाचण्या केल्या २००७. २१ एप्रिल रोजी भारताने ४.६२ लाख चाचण्या केल्या होत्या तर एक महिन्यानंतर त्याच्या सहापट म्हणजे २६.१५ लाख चाचण्या केल्या.

कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.अनेक राज्ये ही एक तर पुरेशा चाचण्या करत नाहीत किंवा माहिती लपवून ठेवतात ही तज्ज्ञांची काळजी आहे. चाचणीची व्यवस्था (सिस्टीम) ही खूप त्रासदायक व बोजड करण्यात आली आहे की, खासगी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना औपचारिकता पूर्ण करून चाचण्या घेणे खूप त्रासदायक झाले असे अहवाल सरकारकडे येत आहेत.

बºयाच खासगी प्रयोगशाळा त्यांच्या क्षमतेच्या फक्त २५ टक्के चाचण्या करत आहेत. दुसरे म्हणजे आयसीएमआरने रुग्णांची जर तयारी नसेल तर खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास मनाई केलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, आयसीएमआरच्या नोडल अधिकाऱ्यांकडून परवानगी आणि औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे निष्कर्षांना विलंब होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या