शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 09:00 IST

lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे.

ठळक मुद्दे संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी सुरू केली धावपळ दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण झाली ताजी

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी दिल्लीमध्ये ६ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. (lockdown in delhi 2021) ही संचारबंदी काल रात्री १० वाजल्यापासून लागू झाली असून, २६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ( After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station)

दिल्लीत सहा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर आनंदविहार पोलीस ठाण्यात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला दिसला नाही. अनेक मजुरांना लवकरात लवकर गावी जाण्याची घाई दिसून येत होती. 

हे दृष्य पाहिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना दिल्लीत थांबवण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. हे केवळ लहान लॉकडाऊन आहे. तसेच त्याचा अवधी वाढणार नाही. तो वाढवावा लागणार नाही. तुम्ही दिल्ली सोडून जाऊ नका. हा निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. या काळात आम्ही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड्सची व्यवस्था करू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMigrationस्थलांतरण