शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची केंद्रात सत्ता आल्यास तिन्ही कृषी विधेयके रद्द करणार- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:49 IST

Rahul Gandhi on farm bills: पंजाबमध्ये काँग्रेसच्या शेतीबचाव यात्रेला सुरुवात

मोगा : तीन कृषीविषयक कायद्यांद्वारे मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन आणि त्यांच्या जेवणाचा घासच काढू पाहत आहे. पण, आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. काँग्रेस सत्तेत येताच हे तिन्ही शेतकरीविरोधी कायदे कचºयाच्या डब्यात फेकण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केली.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांना संपविण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न किमान आधारभूत किंमत, अन्नधान्य खरेदी, घाऊक व्यापारी हे देशाचे तीन स्तंभ असून तेच उद््ध्वस्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.

केंद्र सरकारने तीन कृषीविषयक विधेयके संमत करून आता त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काँग्रेसची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या पक्षाने पंजाबमध्ये तीन दिवसांच्या शेती बचाओ यात्रेचे आयोजन केले आहे.

या यात्रेचा प्रारंभ राहुल गांधी यांनी मोगा जिल्ह्यातील बधनी कलान येथे रविवारी जाहीर सभा घेऊन केला. त्यात राहुल गांधी म्हणाले की, संसदेत मंजूर झालेले तीन कृषीविषयक कायदे शेतकºयांच्या कल्याणासाठी आहेत, असे मोदी सरकार सांगत आहे. असे जर असेल तर शेतकरी या कायद्यांविरोधात निदर्शने का करत आहेत, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कृषीविषयक तीन कायदे तातडीने मंजूर करून त्यांची अंमलबजावणी केली. मोदी सरकार इतकी घाईगर्दी का करत आहे, याचे उत्तर त्याने द्यावे. या कायद्याच्या विधेयकांवर लोकसभा, राज्यसभेत सविस्तर चर्चा का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांसोबत बसले ट्रॅक्टरवर
काँग्रेसतर्फे पंजाबमध्ये काढण्यात येणाºया तीनदिवसीय शेतीबचाव यात्रेमध्ये शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसहित सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी रविवारी एका ट्रॅक्टरवर बसून शेतीबचाव यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत ट्रॅक्टरची संख्याही मोठी आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी