शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 09:14 IST

Rahul Gandhi on Election Commission: केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची निवडणूक आयोगावर टीकाट्विटरच्या माध्यमातून साधला निशाणागेले दोन दिवस राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : आताच्या घडीला पश्चिम बंगाल आणि आसामसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला. केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथील प्रचार जोर धरू लागला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे. (Rahul Gandhi on Election Commission)

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. Election “Commission” असे केवळ दोन शब्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहेत. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले होते. पश्चिम बंगालमध्ये एका भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम यंत्र आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

कृषी कायदे रद्द करायला भाग पाडू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. RSS चा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात असून, किमान आधारभूत किंमत या कायद्यामुळे संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून शेतकऱ्यांना पूर्णत: उद्योगपतींच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस