शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाक बोटीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह, भाजपा संतापली

By admin | Updated: January 4, 2015 14:27 IST

गुजरातमधील खोल समुद्रातील पाकच्या संशयास्पद बोटीवरील कारवाईवर रविवारी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - गुजरातमधील खोल समुद्रातील पाकच्या संशयास्पद बोटीवरील कारवाईवर रविवारी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्र सरकार याआधारे खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला असून काँग्रेसच्या या आरोपावर भाजपाने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पाकमधील बोटीवरुन भारतातील राजकारण भलतेच तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
गुजरातमधील पोरबंदर येथे ३१ डिसेंबर रोजी पाकमधून संशयास्पद बोट आली होती. तटरक्षक दलाने या बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चौघांनी बॉम्बस्फोट घडवून बोट उडवली. तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ला टळला असा दावा केंद्रातर्फे केला जात आहे. संशयास्पद बोटीवरील चौघे जण पाक सैन्याच्या संपर्कात होते असेही समोर येत आहे. मात्र याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असले तरी दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यानेच ही बोट भारतीय हद्दीत आली होती हे स्पष्ट करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. रविवारी काँग्रेसचे नेते अजॉय कुमार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'पाकमधून आलेल्या बोटीविषयी अनेक पैलू समोर येत आहेत. पण यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात होता हेदेखील अस्पष्टच आहे.त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी ठोस स्पष्टीकरण द्यावे' अशी मागणी अजॉय कुमार यांनी केली आहे. 
काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करताच भाजपानेही यावर नाराजी व्यक्त केली. तटरक्षक दलाच्या सतर्कतेचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ही बाब निंदनीय आहे असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे  याद्वारे काँग्रेस पाकिस्तानच्या भूमिकेला पाठबळ देत आहे असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसला काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रसारमाध्यमांऐवजी थेट सरकारकडे विचारणा केली पाहिजे होती. गोपनीय माहितींविषयी उघड चर्चा होत नाही असे त्यांनी नमुद केले.