शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस अपात्र

By admin | Updated: July 26, 2014 01:18 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास काँग्रेस पक्ष अपात्र असल्याचे मत अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी दिले असल्याचे समजते.

नवी दिल्ली : अलीकडच्या निवडणुकीत किमान आवश्यक सदस्य निवडून आलेले नसल्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास काँग्रेस पक्ष अपात्र असल्याचे मत अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी दिले असल्याचे समजते.
सोळावी लोकसभा स्थापन होऊन दोन महिने उलटले तरी सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जा अद्याप कोणालाही दिला गेलेला नाही. 544 सदस्यांच्या लोकसभेत काँग्रेसचे फक्त 44 सदस्य निवडून आले आहेत. असे असले तरी आम्हीच सभागृहातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने व आमची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने हे पद आम्हालाच मिळायला हवे, अशी आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली होती. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य काही मित्रपक्षांच्या 6क् खासदारांच्या सहीची औपचारिक याचिकाही काँग्रेसने लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांच्याकडे सादर केली होती. या पाश्र्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे कायदेशीर सल्ला मागितला होता. त्यानुसार रोहटगी यांनी काँग्रेस विरोधीपक्षनेतेपद मिळण्यास पात्र नसल्याचा लेखी सल्ला शुक्रवारी दिल्याचे सूत्रंनी सांगितले. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के म्हणजेच गणसंख्या पूर्ण होण्यास किमान आवश्यक सदस्यसंख्या असणा:या विरोधी पक्षालाच विरोधी पक्षनेतेपद देण्याविषयीचा आदेश पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणोश वासुदेव मावळंकर यांनी दिला होता. ही प्रथा गेली 6क् वर्षे सातत्याने पाळली गेली आहे व जेव्हा प्रमुख विरोधी पक्षाकडे किमन आवश्यक सदस्यसंख्या नव्हती तेव्हा कोणालाही हे पद न दिले गेल्याचे दोन वेळचे पायंडे आहेत, याचे दाखले अॅटर्नी जनरलनी दिल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
कायद्यानेच दिले आहे स्थान
विरोधी पक्षनेतेपद हे अलीकडच्या काळात केवळ सभागृहातील कामापुरते मर्या दित राहिलेले नाही. लोकपाल, मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त इत्यादी महत्वाच्या पदांवरील नेमणूका करण्यासाठीच्या निवड समित्यांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यास कायद्यानेच सदस्य म्हणून स्थान दिले गेले आहे. त्यामुळे अधिकृपणो हे पद कोणालाच दिले नाही तर या निवड समित्यांवर विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व कोण करणार आणि त्यांना वगळून नेमणुका करणो लोकशाहीला धरून होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.