संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे यांनी आज काँग्रेसवर टीका केली. नेहरु यांना सरकारी पैशांनी बाबरी मशीद बांधायची होती असे त्यांनी विधान केले. दरम्यान, आता या विधानावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने आता संरक्षणमंत्र्यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
काँग्रेस नेते माणिकम टागोर म्हणाले, भाजप खोटे बोलत आहे. या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही कागदपत्रे किंवा कागदोपत्री पुरावे नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. "नेहरूजी धार्मिक कामांसाठी सरकारी पैशाचा वापर करण्याच्या विरोधात होते. त्यांचा असा विश्वास होता की हे काम जनतेच्या सहकार्याने केले पाहिजे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
जर नेहरूंनी लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिरासाठी सरकारी पैसे देण्यास नकार दिला असता, तर त्यांनी बाबरी मशिदीवर सार्वजनिक पैसे खर्च करण्याचा सल्ला का दिला असता?, असा सवाल त्यांनी केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान काय होते?
माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती समारंभात संरक्षणमंत्र्यांनी हे विधान केले. राजनाथ सिंह म्हणाले, "पंडित जवाहरलाल नेहरू जनतेच्या पैशाने बाबरी मशीद पुन्हा बांधू इच्छित होते. जर कोणी त्यांच्या प्रस्तावाला विरोध करत असेल तर ते सरदार पटेल होते. त्यांनी सरकारी पैशाने बाबरी मशीद बांधू दिली नाही."
सोमनाथ मंदिराचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले, "एक ट्रस्ट स्थापन करण्यात आले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सरकारकडून एक पैसाही घेण्यात आला नाही. त्याचप्रमाणे राम मंदिराच्या बांधकामासाठी सरकारने कोणताही निधी दिला नाही. जनतेने योगदान दिले. हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे."
Web Summary : Rajnath Singh's claim that Nehru wanted to rebuild Babri Masjid with public funds sparked Congress's anger. Congress leaders refuted the claim, stating Nehru opposed using state funds for religious purposes, referencing his stance on the Somnath temple reconstruction.
Web Summary : राजनाथ सिंह के नेहरू पर बाबरी मस्जिद निर्माण के आरोप से कांग्रेस नाराज है। कांग्रेस ने इस दावे का खंडन किया और कहा कि नेहरू धार्मिक कार्यों के लिए सरकारी धन के खिलाफ थे, सोमनाथ मंदिर का उदाहरण दिया।