शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

चर्चाच करायची असेल तर या, 1962पासून आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊद्या; राहुल गांधींवर 'शाह अॅटॅक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 2:04 PM

शाह म्हणाले चर्चेला कुणीही घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान जेव्हा संघर्ष करत आहेत, सरकार निश्चित भूमिका घेऊन योग्य प्रकारे पावले टाकत आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी वक्तव्य करणे योग्य नाही.

ठळक मुद्देचीन मुद्द्यावर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातही राजकीय द्वंद्व सुरू आहे.गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताच्या प्रतिक्रियेनंतर, राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करत आहेत.याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी, राहुल गांधींवर पलटवर केला आहे.

नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातही राजकीय द्वंद्व सुरू आहे. लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेसभाजपावर सातत्याने हल्ला चढवत आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारताच्या प्रतिक्रियेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नाही, तर राहुल गांधी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा उल्लेख “Surender Modi” असाही केला होता. याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी, राहुल गांधींवर पलटवर केला आहे. आम्ही चर्चेला घाबरत नाही, चर्चा करायचीच असेल तर या, संसदेत चर्चा करू, 1962पासून ते आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, असे शाह यांनी म्हटले आहे.

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले चर्चेला कुणीही घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान जेव्हा संघर्ष करत आहेत, सरकार निश्चित भूमिका घेऊन योग्य प्रकारे पावले टाकत आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी वक्तव्य करणे योग्य नाही.

कोरोना आणि लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनशी सुरू असलेल्या तणावावर प्रश्न विचारण्यात आला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व भारत दोन्ही युद्ध जिंकत आहे, असे  अमित शाह म्हणाले.

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

शाह म्हणाले, भारत सरकारने कोरोना विरोधात चांगल्या पद्धतीने काम केले आहे. मी राहुल गांधींना सल्ला देऊ शकत नाही. हे काम त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे आहे. काही लोक 'वक्रद्रष्टे' आहेत, त्यांना चांगल्या गोष्टींमध्येही वाईटच दिसते.  भारताने कोरोना विरोधात चांगला संघर्ष केला आहे. जगाच्या  तुलनेत आपले आकडे फार चांगले आहेत.

गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन

यावेळी शाह यांनी आणीबाणीवरही भाष्य करत काँग्रेसवर हल्ला चढवला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून रोजी आणीबाणी जाहीर करून देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचे काम केले. हा कुठल्याही पक्षावरील हल्ला नव्हता, तर देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता. असे शहा म्हणाले.

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

टॅग्स :border disputeसीमा वादAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा