शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला मच्छीमारांच्या सुविधांसाठी आली जाग; केंद्राकडून त्रिपक्षीय कराराचा मसुदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 07:18 IST

केंद्र सरकारने याबाबतच्या त्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा पाठविल्यावर त्यानुसार नाबार्डसोबत करारनामा करण्यात येणार आहे

नारायण जाधव

ठाणे : देशातील मच्छीमारांना सागरकिनाऱ्यावर सोयीसुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने २०१८ च्या अर्थसंकल्पात ७५२२ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, तो प्राप्त करण्यासाठी त्रिपक्षीय करार करणे आवश्यक असून त्याचा मसुदा केंद्राने जानेवारी २०२० पर्यंत दिलेला नव्हता. आता प्राप्त झाल्याने महाराष्ट्राच्या ७२० किमी सागरकिना-यावरील तीन प्रमुख मासेमारी बंदरे आणि १७३ मासळी उतरवण्यासाठीच्या केंद्रांवर सोयीसुविधा देणे सोपे होणार आहे.

केंद्र सरकारने याबाबतच्या त्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा पाठविल्यावर त्यानुसार नाबार्डसोबत करारनामा करण्यात येणार आहे. यात कमीतकमी ५०० काेटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. मात्र, हे कर्ज वर्षभराच्या आत उचलले नाही, तर ते व्यपगत होणार आहे. तसेच पहिला हप्ता मंजूर झाल्यावर पहिल्या दोन वर्षांत ते पूर्णपणे घ्यावे लागेल. या योजनेचा कालावधी २०२३ पर्यंत अूसन तिचा जास्तीतजास्त निधी घेण्यासाठी राज्य सरकारला धावपळ करावी लागणार आहे. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १२ वर्षांचा राहणार आहे.

या २० सुविधा पुरविता येणार
सागरी भागामध्ये नवी बंदरे उभारणे, जेट्टी बांधणे, बर्फ कारखाना बांधणे, शीतगृह उभारणे, मासळी मार्केटचे आधुनिकीकरण करणे, मत्स्यबीज बँक तयार करण्यासाठी तत्सम २० सुविधा उभारता येणार आहेत.

कोकणाला होणार मोठा फायदा
महाराष्ट्राच्या ७२० किमीच्या कोकण किनारपट्टीवरील मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना या याेजनेतून जास्तीतजास्त निधी प्राप्त करून अनेक संकटांना ताेंड देणा-या मच्छीमारांना या ७५२२ कोटी ४८ लाख निधीपैकी जास्तीतजास्त निधी मिळवून दिलासा देता येणार आहे.
 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार