शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’

By admin | Updated: January 3, 2015 02:30 IST

भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा आता विभाजनवादी रणनीतीचा अवलंब करीत असल्यामुळे भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.‘भाजपाची हवा हळूहळू निघू लागली आहे आणि २०१५ मध्ये त्यांच्या दांभिकतेचा पराभव होईल. २०१४ मध्ये काळा पैसा परत आणणे, युवकांना रोजगार देणे व बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारखी अनेक खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली आहे; परंतु ही सर्व आश्वासने आता थंडबस्त्यात ठेवण्यात येत आहेत. भाजपा आता धर्मांतर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे नाव घेऊन जहाल संघटनांच्या मदतीने विभाजनवादी रणनीतीच्या आधारे लोकांचे लक्ष आपल्या अजेंड्यावरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे नितीशकुमार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.जुन्या जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, विलीनीकरण निश्चित होणार आहे. फक्त काही औपचारिकता बाकी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला अखंड जनता पार्टीसोबत येण्याचे निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर ‘या सर्व भविष्यातील गोष्टी आहेत’, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)४नव वर्षात भाजपाच्या राजवटीत आनंद साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या पतनाची सुरुवात होईल, असे भाकीत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वर्तविले आहे.‘आम्ही प्रत्येकाचे नूतन वर्षाभिनंदन करतो. पण यावेळी भाजपाच्या राजवटीत नववर्षात जल्लोष करण्यासारखे काही नाही. भाजपाच्या राजवटीत गरिबांचे धर्मांतर होत आहे, असे ते म्हणाले.केंद्रातील मंत्री विरोधकांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करीत आहेत आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव केला जात आहे. आता तिरंग्याच्या जागी ते भगवा ध्वज आणतील, तो दिवस काही फार दूर नाही’, असे लालूप्रसाद म्हणाले.