शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:40 AM

गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.

 नवी दिल्ली : गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी मोदी यांनी आश्वासने पूर्ण कशी केली नाहीत, याची उदाहरणेच दिली. ते म्हणाले की, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणलेली नमामी गंगे योजना २0१९ पर्यंत संपेल, असे सांगितले होते. त्यासाठी २0 हजार कोटींची तरतूद केली. त्यापैकी केवळ ६ हजार कोटी रुपयेच खर्च केले. योजनेतील ट्रीटमेंट प्लांटचे काम १0 टक्केच पूर्ण झाले असून, वाराणसीत गंगा आजही सर्वाधिक प्रदूषित आहे.जालियनवाला बाग हत्याकांड ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: मोदी आहेत. पण पाच वर्षांत त्यांनी ट्रस्टची एकही बैठक घेतली नाही वा ट्रस्टवर एकाचीही नेमणूक केली नाही. ट्रस्टमार्फत कामे करण्यासाठी ४0 कोटींची घोषणाही केली. पण तो निधी दिलाच नाही, अशी टीका त्यांनी केली. अडीच लाख गावांमध्ये फेब्रुवारी २0१९ पर्यंत डिजिटल इंडिया योजनेद्वारे इंटरनेट कनेक्टिविटी पोहोचवू, असा दावा केला. पण अद्याप १ लाख १ गावांमध्येच इंटरनेट पोहचले आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २0२0 पर्यंत ४0 कोटी लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला होता. पण आतापर्यंत ४१ लोकांनाच प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून रोजगार मिळालेल्यांची संख्या ६ लाखच आहे, असे ते म्हणाले.स्मृती इराणी या तर रडणारे बाळअमेठीमध्ये काँग्रेसतर्फे बुथ कॅप्चरिंग सुरू असल्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या आरोपाचा समाचार घेताना सिद्धू म्हणाले की, इराणी या तर सतत रडणारे बाळ आहेत. त्या सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकलेल्या नाहीत. दिल्लीत त्या पराभूत झाल्या, अमेठीमध्येही त्यांचा पराभव झाला. आताही त्यांचा पराभव अटळ आहे. त्यामुळेच त्या असले आरोप करीत आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक