शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:11 AM

काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे,

लखनऊः काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे, देशात अराजकतेची परिस्थिती आहे, असं म्हणत मायावतींनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. बहुजन समाज पार्टी(BSP)च्या मायावतींनी बुधवारी राजधानी लखनऊमध्ये 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जशा प्रकारे काँग्रेसच्या पूर्वीच सरकारनं काम केलं आहे, त्याच पद्धतीनं भाजपाचं काम सुरू आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच तणाव आणि अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लखनऊमधल्या मॉल एव्हेन्यूस्थित बसपा मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गरीब आणि दलित विरोधी कृत्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून बाहेर हाकललं. आता सत्तेत आलेल्या भाजपाचीसुद्धा त्याच मार्गानं वाटचाल सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची दशा खालावत चाललेली असून, देशाची अवस्था वाईट आहे. केंद्राच्या चुकीच्या नीतींमुळे आज देशातील गोरगरीब जनता त्रासलेली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं तर भाजपा काँग्रेसपेक्षा दोन पावलं पुढेच आहे. काँग्रेसमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत परतली आहे. आता काँग्रेस अँड कंपनी भाजपाच्या चुकीच्या धोरणांचा हवाला देत सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गरिबांच्या दुःखाची बसपाला कल्पना आहे. गरिबांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायमच लढत राहू, असंही मायावती म्हणाल्या आहेत. मायावतींनी नोटाबंदी, जीएसटी, सीएए, एनआरसी आणि एनपीआर सारखे मुद्दे उपस्थित करत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी करण्यापेक्षा केंद्रानं गरीब, दलित, आदिवासी आणि मागास वर्गाच्या कल्याणासाठी काम केलं असतं ते योग्य ठरलं असतं.  

टॅग्स :mayawatiमायावती