शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:56 IST

गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात

नवी दिल्ली - नुकतेच गुजरात एटीएसनं ISIS शी निगडित एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. ज्यात 'रिसिन' नावाचं रासायनिक विषाचा वापर करण्याचं षडयंत्र होते. हे विष एरंडीच्या बियांपासून तयार केलेले असते. जे घराघरात सहजपणे मिळते. परंतु हे किती धोकादायक आहे? याच्या अगदी थोड्या प्रमाणातही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

रिसिन म्हणजे काय? 

रिसिन हे एरंडेल वनस्पतीच्या (रिसिनस कम्युनिस) बियांमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे. ही वनस्पती जगभरात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी लागवड केली जाते. एरंडेल तेल औषधे, साबण आणि यंत्रसामग्रीमध्ये वापरले जाते. मात्र या बियांमध्ये रिसिन नावाचे विष असते, जे इतके शक्तिशाली आहे की ते जैविक शस्त्र मानले जाते. अमेरिका आणि रशिया सारख्या देशांनी एकेकाळी ते शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार केला होता.

रिसिन ही एक पांढरी, गंधहीन आणि चवहीन पावडर आहे. ती खाल्ल्याने, श्वास घेताना किंवा इंजेक्शनने शरीरात टाकली जाऊ शकते. सुदैवाने ती संसर्गजन्य नाही - ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. हवेत सोडल्यास किंवा पाण्यात मिसळल्यास ती व्यापक नुकसान करू शकते. एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते.

रिसिन कसे बनवले जाते?

एरंडीच्या बियाण्यांमधून तेल काढल्यानंतर उरणारा कचरा, ज्याला "एरंडेल केक" म्हणतात, हा रिसिनचा मुख्य स्रोत आहे. दरवर्षी जगभरात २० लाख टनांहून अधिक एरंडेल बियाण्यांवर प्रक्रिया केली जाते. या कचऱ्यापैकी ५% रिसिन असते. बियाणे कुस्करले जातात आणि गरम पाणी किंवा रसायनांचा वापर करून तेल वेगळे केले जाते. उर्वरित लगदा रिसिनने भरलेला असतो. रिसिन घरी बनवणे देखील सोपे आहे मात्र ही प्रक्रिया धोकादायक आहे. विषाचा एक छोटासा भाग देखील हवेत जाऊ शकतो आणि आजार निर्माण करू शकतो.

गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात. रिसिन जगातील सर्वात घातक विषापैकी एक आहे. हे शरीरातील आतून पेशी नष्ट करते. यावर कोणताही इलाज किंवा उतारा नाही, फक्त लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. २०२२ मध्ये बेल्झियममध्ये एका महिलेने केस गळती रोखण्यासाठी ६ बिया खाल्ल्या, त्यातून तिला खूप वेदना, उलटी झाली परंतु वेळीच उपचार केल्याने ती वाचली. भारतात या वनस्पतीची शेतीही होते, त्याचा कचराही सहज मिळतो. त्यामुळे दहशतवाद्यांनी याचा वापर करणे पसंत केले. गुजरातच्या डॉक्टरने शहरांमध्ये हल्ला करण्याची योजना बनवली होती. मोठ्या प्रमाणात रिसिन हवेत सोडले असते तर असंख्य मनुष्यांना त्याचा त्रास झाला असता. 

English
हिंदी सारांश
Web Title : India terror plot foiled: Ricin seized from Gujarat ISIS suspect.

Web Summary : Gujarat ATS thwarted an ISIS-linked terror plot involving ricin, a potent toxin derived from castor beans. A doctor planned attacks, but the plot was foiled. Ricin is deadly; no antidote exists; treatment focuses on symptoms.
टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीIndiaभारत