शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामा

By मोरेश्वर येरम | Updated: November 19, 2020 17:11 IST

भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. 

ठळक मुद्देकुलगुरू असतानाच्या काळात मेवालाल यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपभरती घोटाळ्याचा आरोप असल्याने मेवालाल यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामालालूप्रसाद आणि तेजस्वी यादव यांनी केली होती सडकून टीका

पाटणाबिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं सरकार स्थापन झालं असलं तरी या सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. नव्या सरकारमधील शिक्षण मंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मेवालाल यांना अवघ्या ७२ तासांच्या आतच मंत्रिपदाला रामराम करावा लागला आहे. 

डॉ. मेवालाल चौधरी यांनी मंगळवारी नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण राजद पक्षाने मेवालाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारमध्ये भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. 

'तेजस्वी जेव्हा आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये बिहारमधील युवांना १० लाख नोकऱ्या देण्यासाठी वचनबद्ध होता. तर दुसरीकडे भरती घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवण्याची नितीश कुमार यांची प्राथमिकता होती', असं ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केलं होतं. 

मेवालाल यांनी घेतली होती नितीश कुमारांची भेटविरोधकांच्या जोरदार टीकेनंतर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नवनियुक्त शिक्षण मंत्री मेवालाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास अर्धातास झालेल्या या बैठकीनंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात होते. अखेर आज मेवालाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच्या काळात पदाचा गैरवापर करुन नियुक्ती केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण भागलपूर एडीजी-१ यांच्याकडे विचारधीन असून अद्याप चार्चशीट दाखल झालेली नाही. 

२०१५ साली पहिल्यांचा आमदार झाले होते मेवालाल चौधरीमेवालाल चौधरी २०१५ साली पहिल्यांदाच जदयूकडून आमदार झाले होते. याआधी ते शिक्षकाची नोकरी करत होते. विद्यापीठाचे कुलगुरू असतानच्या काळात त्यांनी २०१२ साली सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ वैज्ञानिकांच्या पदांच्या भरतीसाठी पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर २०१७ साली याप्रकरणी सबौर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता आणि आजवर त्यांच्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण