शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस गळती; पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, केंद्राची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:46 IST

1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Bhopal Gas Tragedy : 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. केंद्र सरकारने 1989 मध्ये निश्चित केलेली भरपाई अपुरी असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने युनियन कार्बाइड आणि डाऊ केमिकल्सला 7844 कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला आहे.

काय प्रकरण आहे?2 ते 3 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कीटकनाशक प्लांटमधून मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली. यामुळे हजारो लोक मरण पावले. मृत्यूची अधिकृत आकडेवारी 3,500 पेक्षा जास्त आहे. पण, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्या रात्री गॅसच्या प्रभावामुळे मृत्यू झालेल्या आणि नंतर आजारपणाने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 15,000 पेक्षा जास्त आहे.

1989 सालचा करारफेब्रुवारी 1989मध्ये युनियन कार्बाइड आणि केंद्र सरकार यांच्यात नुकसान भरपाईचा करार झाला. यामध्ये कंपनी 470 मिलियन डॉलर (सुमारे 715 कोटी रुपये) देणार असल्याचे ठरले. या कराराला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. नंतर सरकारने ही रक्कम अपुरी असल्याचे म्हणायला सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल करुन 7844 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. न्यायालयाने युनियन कार्बाइड आणि तिची भारतातील बदली कंपनी डाऊ केमिकल्सला ही रक्कम भारतात भरण्यास सांगावी, अशी केंद्राची मागणी होती.

न्यायालयाने काय म्हटले?या वर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राच्या याचिकेवर सुनावणी केली. पुनर्विलोकन याचिका दाखल न करता थेट क्युरेटिव्ह याचिका दाखल करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे न्यायाधीशांनी मानले. निकालानंतर 21 वर्षांनी याचिका दाखल करण्यात आल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. न्यायमूर्ती कौल यांनी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा संयुक्त निकाल वाचून दाखवला. "आमच्या मते नुकसानभरपाईची रक्कम पुरेशी होती. जर सरकारला ती अपुरी वाटत होती, तर त्यांनी स्वतःहून अधिक भरपाई द्यायला हवी होती. असे न करणे निष्काळजीपणा आहे. त्या घटनेला 3 दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर कंपनीला नव्याने पैसे भरण्यास सांगता येणार नाही.

त्या रात्री नेमकं काय झालं?2-3 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कारखान्यातील टाकी क्रमांक 610 मध्ये मिथाइल आयसोसायनाइड हे घातक रसायन होते. टाकीत पाणी पोहोचले आणि तापमान 200 अंशांवर गेले. यामुळे टाकीचा स्फोट झाला आणि 42 टन विषारी वायूची गळती झाली. अँडरसन तेव्हा युनियन कार्बाइडचा प्रमुख होता.

अपघातानंतर चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली, मात्र जामीन मिळाल्यानंतर तो अमेरिकेत परतला. पुन्हा कधीही भारतीय कायद्यांच्या तावडीत तो आला नाही. त्याला फरारी घोषित करण्यात आले. अमेरिकेतून त्याचे प्रत्यार्पण करण्याचेही प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. 29 सप्टेंबर 2014 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे अँडरसनचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

टॅग्स :bhopal-pcभोपाळSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू