शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
3
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
4
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
5
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
6
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
7
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
8
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
9
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
10
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
11
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
12
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
13
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
14
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
15
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
16
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
17
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
18
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
19
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
20
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस गळती; पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, केंद्राची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:46 IST

1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Bhopal Gas Tragedy : 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. केंद्र सरकारने 1989 मध्ये निश्चित केलेली भरपाई अपुरी असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने युनियन कार्बाइड आणि डाऊ केमिकल्सला 7844 कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला आहे.

काय प्रकरण आहे?2 ते 3 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कीटकनाशक प्लांटमधून मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली. यामुळे हजारो लोक मरण पावले. मृत्यूची अधिकृत आकडेवारी 3,500 पेक्षा जास्त आहे. पण, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्या रात्री गॅसच्या प्रभावामुळे मृत्यू झालेल्या आणि नंतर आजारपणाने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 15,000 पेक्षा जास्त आहे.

1989 सालचा करारफेब्रुवारी 1989मध्ये युनियन कार्बाइड आणि केंद्र सरकार यांच्यात नुकसान भरपाईचा करार झाला. यामध्ये कंपनी 470 मिलियन डॉलर (सुमारे 715 कोटी रुपये) देणार असल्याचे ठरले. या कराराला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. नंतर सरकारने ही रक्कम अपुरी असल्याचे म्हणायला सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल करुन 7844 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. न्यायालयाने युनियन कार्बाइड आणि तिची भारतातील बदली कंपनी डाऊ केमिकल्सला ही रक्कम भारतात भरण्यास सांगावी, अशी केंद्राची मागणी होती.

न्यायालयाने काय म्हटले?या वर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राच्या याचिकेवर सुनावणी केली. पुनर्विलोकन याचिका दाखल न करता थेट क्युरेटिव्ह याचिका दाखल करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे न्यायाधीशांनी मानले. निकालानंतर 21 वर्षांनी याचिका दाखल करण्यात आल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. न्यायमूर्ती कौल यांनी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा संयुक्त निकाल वाचून दाखवला. "आमच्या मते नुकसानभरपाईची रक्कम पुरेशी होती. जर सरकारला ती अपुरी वाटत होती, तर त्यांनी स्वतःहून अधिक भरपाई द्यायला हवी होती. असे न करणे निष्काळजीपणा आहे. त्या घटनेला 3 दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर कंपनीला नव्याने पैसे भरण्यास सांगता येणार नाही.

त्या रात्री नेमकं काय झालं?2-3 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कारखान्यातील टाकी क्रमांक 610 मध्ये मिथाइल आयसोसायनाइड हे घातक रसायन होते. टाकीत पाणी पोहोचले आणि तापमान 200 अंशांवर गेले. यामुळे टाकीचा स्फोट झाला आणि 42 टन विषारी वायूची गळती झाली. अँडरसन तेव्हा युनियन कार्बाइडचा प्रमुख होता.

अपघातानंतर चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली, मात्र जामीन मिळाल्यानंतर तो अमेरिकेत परतला. पुन्हा कधीही भारतीय कायद्यांच्या तावडीत तो आला नाही. त्याला फरारी घोषित करण्यात आले. अमेरिकेतून त्याचे प्रत्यार्पण करण्याचेही प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. 29 सप्टेंबर 2014 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे अँडरसनचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

टॅग्स :bhopal-pcभोपाळSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू