शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार आहेत म्हणून अटक करणे बेकायदा- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:34 IST

Supreme Court : एका प्रकरणात आरोपीने गुन्ह्यात सहकार्य केले. तपास पूर्ण झाला. दोषारोपपत्रही तयार झाले. मात्र, न्यायालयाने आरोपी हजर केल्याशिवाय दोषारोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला.

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : कायद्यात अटकेची तरतूद आहे. आपल्याला अटकेचे अधिकार आहेत, म्हणून पोलिसांनी सर्वच गुन्ह्यांत आरोपींना अटक करणे आवश्यक नाही, असे स्पष्ट करीत व्यक्तिस्वातंत्र्य हा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

एका प्रकरणात आरोपीने गुन्ह्यात सहकार्य केले. तपास पूर्ण झाला. दोषारोपपत्रही तयार झाले. मात्र, न्यायालयाने आरोपी हजर केल्याशिवाय दोषारोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांनी शेवटी अटक करून दोषारोपपत्र पाठविण्याची तयारी केली. आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मागितला; पण अर्ज फेटाळण्यात आला.

याविरुद्ध आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने हे अपील मंजूर करताना आरोपीशिवाय दोषारोपपत्र न घेण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा व अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा उच्च न्यायालयाचा, असे दोन्ही आदेश रद्द केले.

अटक केव्हा करावी ?
१) जघन्य गुन्ह्यातील आरोपी असल्यास
२) कोठडीत विचारपूस आवश्यक असेल तर
३) साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याची शक्यता असेल तेंव्हा
४) आरोपी फरार होण्याची शक्यता असल्यास

- आरोपीच्या अटकेचे अधिकार असणे व त्याचा न्याय्य प्रमाणात वापर करणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
    रुटीन अटकेमुळे व्यक्तीच्या प्रतिष्ठा व आत्मसन्मानाची अपरिमित हानी.
- दोषारोपपत्र स्वीकारण्यासाठी आरोपी हजर ठेवण्याची न्यायालयाची अट चुकीची. पोलीस अधिकाऱ्यांवर असे बंधन घालता येणार नाही.
-  सर्वच दखलपात्र व अजामीन पात्र गुन्ह्यांत अटक करणे व न्यायालयात हजर करण्याची आवश्यकता नाही.  -न्या. संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय, 
    सर्वोच्च न्यायालय (एसएलपी (क्री.) ५४८२/२१)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArrestअटकPoliceपोलिस