शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 20:11 IST

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते.

श्रीनगर : भारतीय सैन्याने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या चकमकप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. सैन्य दलाला प्राथमिक दृष्ट्या पुरावे सापडले असून भारतीय जवानांनी (Amashipora Shopian) जिल्ह्यातील एका कारवाईत अफस्पा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. यामुळे सैन्य दलाने जवानांविरोधात कारवाई सुरु केली आहे. 

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. य़ा वादानंतर सैन्याने चौकशीचे आदेश दिले होते. अमाशीपोरामध्ये कथितरित्या दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यावर श्रीनगरचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, सोशल मीडियावर या चकमकीबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये राजौरीचे राहणारे तीन जण अमशीपोरा येथून बेपत्ता झाले होते, असे म्हटले होते. 

या चकमकीत जे लोक मारले गेले होते त्यांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हे सारे मजूर होते. त्यांना दहशतवादी सांगून मारण्यात आले होते. या सर्वांचे डीएनए सॅम्पल सैन्याने घेतले होते. मात्र, नंतर वाद सुरु झाल्याने सैन्याने चार आठवड्यांत याची चौकशी पूर्ण करत जवानांवर कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला आहे. 

अफस्पाच्या नियमांचे उल्लंघनसैन्याने चौकशी पूर्ण झाल्यावर सांगितले की, या चकमकीदरम्यान अफस्पा, 1990 नुसार सैन्याला मिळालेल्या ताकदीचा गैरवापर केला आहे. याचे पुरावे समोर आले आहेत. यामुळे सैन्य दलाने या चकमकीत सहभागी असलेल्या जवानांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी