शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

...तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 4:00 PM

पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे.

अमेठीः पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे. लष्कर पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अभियान राबवण्यास सज्ज आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी पीओकेसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना रावत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर परत भारतानं मिळवण्याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. मोदी सरकारनं सांगितल्यास आम्ही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास पूर्ण तयार आहोत. लष्कर कोणत्याही अभियानासाठी सदैव तयार असल्याचा उल्लेखही बिपीन रावत यांनी केला आहे.रावत म्हणाले, पीओकेसंदर्भात सरकारनं केलेल्या विधानामुळे आनंद झाला. परंतु याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. आम्ही आदेशावर काम करतो. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पीओकेसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत आता पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. 6 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370वरच्या चर्चेदरम्यान संसदेत सांगितलं होतं की, आम्ही जीव देऊ पण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवूच. पाकव्याप्त काश्मीरबद्दल लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले, सरकारनं पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लष्कर कोणत्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी तयार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचंही लष्कर प्रमुखांनी स्वागत केलं आहे. काश्मीरचे लोक आमच्या देशातीलच आहे. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांना शांती बहाल करण्यासाठी सुरक्षा जवानांना एक संधी दिली पाहिजे. 30 वर्षं त्यांनी दहशतवादाला तोंड दिलं. आता शांतीसाठी त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत