शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

..तर होईल समाजाचा अंत !

By admin | Updated: October 31, 2014 01:08 IST

भ्रष्टाचार संपवला नाही तर आणि त्याबाबत सातत्याने ढिलाई दाखवत राहिल्यास समाजाचा अंत ओढवेल, असा खणखणीत इशारा दिल्ली न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचार संपवला नाही तर आणि त्याबाबत सातत्याने ढिलाई दाखवत राहिल्यास समाजाचा अंत ओढवेल, असा खणखणीत इशारा दिल्ली न्यायालयाने दिला आहे. एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या(एनआयसी) घोटाळ्याबाबत दोन कर्मचारी आणि अन्य तिघांना दोषी ठरवत चार वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षाही सीबीआय न्यायालयाने ठोठावली.
 एनआयसीचे तत्कालीन दोघे सहायक व्यवस्थापक जी.सी. गुप्ता आणि व्ही.पी. पंधी हे कंपनीच्या अन्य व्यवहारातही दोषी आढळले. त्यावर विशेष सीबीआय न्यायाधीश कंवलजित अरोरा यांनी बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. भ्रष्टाचाराचा आर्थिक व्यवस्थेच्या प्रभावी कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. यशासाठी गुणवत्तेचा आधार मानण्याच्या विश्वासाला तडा जातो. भ्रष्टाचाराबद्दल नरमाई अवलंबल्यास समाजाचा मृत्यू ओढवेल, असे ते म्हणाले. मुनीश यादव, अरविंद कुमार शर्मा आणि पी.सी. मोहन या अन्य तिघांनाही त्यांनी दोषी ठरविले. 
26 पानी आरोपपत्र
कर्मचा:यांवर सार्वजनिक पैशाची जबाबदारी सोपविलेली असते. सामाजिक अर्थव्यवस्थेचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी सर्वोच्च औचित्य आणि परादर्शकतेने पार पाडायला हवी, असे न्यायालयाने 26 पानी आरोपपत्रत स्पष्ट                केले. मुनीश यादव या मुख्य आरोपीला 4.75 लाख तर गुप्ता, पंधी,                  शर्मा आणि मोहन यांना न्यायालयाने 75 हजार रुपयांचा दंडही          ठोठावला. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4 1997-98 मध्ये दोन ठिकाणी सागरी मालवाहतुकीसाठी बनविण्यात आलेल्या विमा पॉलिसीच्या दाव्यासाठी बनावट दस्तऐवज सादर करीत 2 लाख 32 हजारांचे नुकसान घडवून आणण्यासाठी कट रचल्याबद्दल न्यायालयाने पाच जणांना 16 ऑक्टोबर रोजी दोषी ठरविले. 
4न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट दस्तऐवजांचा वापर आदी गुन्हय़ांसाठी विविध कलमांचा आधार घेतला. गुप्ता आणि पंधी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची स्वतंत्र कलमे लावण्यात आली. 
 
4अन्य एक आरोपी के.व्ही. जुनेजा याला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले, तर राजपाल यादव या आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे त्याला खटल्यातून वगळण्यात आले.