शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:39 IST

Pahalgam Terror Attack : कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे.

कधीकधी वेळ फक्त सरत नाही, तर ती आतपर्यंत जखम देऊन जाते. २२ एप्रिलची तारीख २६ कुटुंबांसाठी भयंकर ठरली आहे, त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसांना गमावलं. आज एक वर्ष उलटलं आहे, पण दुःख तसंच आहे. कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे.

ऐशान्या सांगतात की, त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते, पहलगाममध्ये त्यांच्यासमोरच शुभम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घरी परतणं, ज्या भिंतींच्या आत शुभम नाहीत तिथे राहणं हे खूप कठीण आहे. अनेकदा त्या शुभमच्या फोटोसमोर बसून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. "मला त्यांना सांगायचं असतं की आज मी काय केलं, मला काय वाटलं... पण ते तिथे नाहीतच. मी त्यांचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करते, जे खूप कठीण आहे."

"योगी आदित्यनाथ यांची भेट होऊ शकली नाही"

पंतप्रधानांच्या भेटीचा उल्लेख करताना ऐशान्या सांगतात की, त्यावेळी परिस्थिती अत्यंत भावूक होती, त्या आपलं म्हणणं मांडू शकल्या. त्या म्हणतात की, "पंतप्रधानांशी बोलणं झालं, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं." त्याचबरोबर त्या सांगतात की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट अद्याप होऊ शकलेली नाही. "जेव्हा मुख्यमंत्री योगी आमच्याकडे आले होते, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती की आम्ही त्यांच्याशी काही बोलू शकलो असतो. आता मी अनेक वेळा त्यांचा वेळ मागितला आहे. २-३ वेळा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही. मला किमान एकदा त्यांच्यासमोर बसून बोलायचं आहे" असं ऐशान्या सांगतात.

"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावून घेतलं"

काश्मीरबद्दल ऐशान्या यांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. पर्यटनामुळे तिथल्या लोकांचे जीवन सुधारेल असं त्या मानतात. "जेव्हा लोकांना योग्य मार्गाने पैसे मिळतील, तेव्हा ते चुकीचा मार्ग का निवडतील?" पण त्याचवेळी त्या हे देखील सांगतात की, काश्मीरची दुसरी बाजूही आहे जिथे काही लोक दहशतवाद्यांना आश्रय देतात. "दोन्ही बाजू आहेत. आता लोकांनी स्वतः ठरवायचं आहे की त्यांनी तिथे जायला हवं की नाही." स्वतःबद्दल त्या स्पष्टपणे सांगतात की, "मी कधीही काश्मीरला जाणार नाही, कारण त्या जागेने माझे सर्वस्व हिरावून घेतलं आहे."

"मी भाग्यवान आहे की मला खंबीर कुटुंब मिळालं"

ऐशान्या मानतात की शुभमचं कुटुंबीय त्यांच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरले. त्या म्हणतात की, "मी भाग्यवान आहे की मला इतकं खंबीर कुटुंब मिळालं आहे. त्यांनी प्रत्येक क्षणी माझी साथ दिली." पण तरीही, एक असा 'सॅच्युरेशन पॉइंट' येतो जेव्हा मनातील दुःख बाहेर येतेच., हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' सारखी मोहीम राबवली. काम सुरू आहे, लष्कर सतत ऑपरेशन्स करत आहे. पण जोपर्यंत दहशतवाद ०.०१ टक्के जरी शिल्लक आहे, तोपर्यंत आपण थांबता कामा नये."

"कोणाचा जीव घेण्याचा अधिकार फक्त देवाला"

दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स' असायला हवा, असं त्या ठामपणे सांगतात. "जे लोक दहशत पसरवतात किंवा त्याचे समर्थन करतात, त्यांना जगण्याचा अधिकार नसावा." मात्र, त्या हे देखील जोडतात की, "कोणाचा जीव घेण्याचा अधिकार फक्त देवाला आहे, माणसाने माणसाचा जीव घेणं चुकीचं आहे. पण जे दहशतवाद पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Widow's grief: Loss in terror attack, unfulfilled meeting with Yogi.

Web Summary : A year after losing her husband in a terror attack, Aishanya shares her pain. She seeks a meeting with Yogi Adityanath and expresses her resolve to never return to Kashmir, the place that took everything from her. She advocates zero tolerance for terrorism.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश