शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

...तर 'त्या' भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी घटणार; महाराष्ट्रासाठी परिस्थिती आणखी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 2:13 PM

वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर; तब्बल ४८ कोटी भारतीयांच्या प्रकृतीवर परिणाम

नवी दिल्ली: जगातील वायू प्रदूषणाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. याचा थेट परिणाम पर्यावरण आणि माणसाच्या आरोग्यावर होत आहे. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य कमी होण्याची भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील संशोधक गटानं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी कमी होऊ शकतं, अशी भीती संशोधक गटाकडून वर्तवण्यात आली आहे.

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटनं (ईपीआयसी) वायू प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दलचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे तब्बल ४८ कोटी लोक वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. या वायू प्रदूषणाचं स्वरुप गंभीर आहे. भौगोलिक स्थिती विचारात घेतल्यास वायू प्रदूषणाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याची माहिती अहवालात आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेचा दर्जा वेगानं घसरत असल्याचं अहवाल सांगतो.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी २०१९ मध्ये स्वच्छ हवा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचं अहवालातून कौतुक करण्यात आलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली लक्ष्य पूर्ण झाल्यास देशातील नागरिकांचं आयुमान १.७ वर्षांनी, तर दिल्लीतल्या नागरिकांचं आयुष्य ३.१ वर्षांनी वाढेल. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतल्या प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे.

औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ हवा अभियान सुरू करण्यात आलं. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. २०२४ पर्यंत देशातील १०२ शहरांतील प्रदूषण २० ते ३० टक्के कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण