शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एअर इंडिया करणार मालमत्तांची विक्री; सुमारे ३०० कोटी रुपये जमविण्याचा इरादा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 9:06 AM

एअर इंडियाने देशाच्या विविध भागामध्ये असलेल्या आपल्या स्थावर मिळकतींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : निर्गुंतवणुकीच्या मार्गावर अग्रस्थानी असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने देशभरातील आपल्या निवडक मालमत्तांची विक्री करण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या असून या विक्रीमधून २०० ते ३०० कोटी रुपये मिळण्याचा कंपनीला विश्वास आहे. यामुळे कंपनीला होत असलेला तोटा काही प्रमाणात भरून काढता येणार आहे. 

एअर इंडियाने देशाच्या विविध भागामध्ये असलेल्या आपल्या स्थावर मिळकतींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएसटीसीची मदत घेतली जाणार आहे. एमएसटीसीमार्फत या मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-निविदा मागविल्या जाणार आहेत. ८ जुलैला निविदा खुल्या होणार असून ९ जुलै रोजी त्यांची मुदत संपणार आहे. 

एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मालमत्तांच्या लिलावातून एअर इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला २०० ते ३०० कोटी रुपये मिळतील, असा प्राथमिक अंदाज आहे. सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेली ही कंपनी चालविणे ही सरकारला डोकेदुखी ठरल्याने तिची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

या मालमत्तांची होणार आहे विक्री...

एअर इंडिया आपल्या विविध मालमत्तांची विक्री करणार आहे, त्यामध्ये मुंबईमधील एक निवासी भूखंड व फ्लॅट, नवी दिल्ली येथील पाच फ्लॅट, बंगळुरू येथील एक निवासी भूखंड आणि कोलकाता येथील चार फ्लॅट या महानगरांमधील मिळकती आहेत. याशिवाय औरंगाबाद येथील बुकिंग ऑफिस व कर्मचारी निवासस्थाने, नाशिकमधील सहा फ्लॅट, नागपूर येथील बुकिंग कार्यालय, भूज येथील एअरलाईन हाऊस व एक निवासी भूखंड, तिरुवनंतपूरम येथील एक भूखंड व मंगलोरमधील दोन फ्लॅट आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया