शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:28 IST

अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमध्ये चुकीच्या व्यक्तींचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण  देशाला हादरवरुन सोडलं.  १२ जून रोजी, एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमानान अहमदाबादहून गॅटविक लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इमारतीवर कोसळले. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला, ज्यात विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. मृतांमध्ये परदेशातील नागरिकांचाही समावेश होता. या विमान दुर्घटनेला महिना उलटला असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडिया अपघातातील मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचले आहेत.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. यापैकी २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. विमान कोसळ्यानंतर मोठ्या प्रमाणात इंधनाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते. मात्र आता ब्रिटनमधील दोन कुटुंबांना चुकीचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघातानंतर, मृतदेहांची ओळख पटवून कुटुंबियांना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. पण एक मोठी चूक समोर आली आहे. ब्रिटिश माध्यमांनुसार, ब्रिटनमधील दोन कुटुंबांना विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांऐवजी चुकीच्या मृतदेहांचे अवयव पाठवण्यात आले आहेत.हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि चौकशीची मागणी केली.

इनर वेस्ट लंडनच्या कोरोनर डॉ. फियोना विल्कॉक्स यांनी डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चूक उघडकीस आली. अपघातानंतर, ब्रिटिश नागरिकांचे कुटुंबिय भारतात आले होते आणि त्यांनी मृतदेह मिळविण्यासाठी डीएनएचे नमुने दिले. त्यानंतर, भारतातून डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवण्यात आले. मा लंडनमध्ये पुन्हा एकदा डीएनए चाचणी केल्यानंतर चूक पकडली गेली.

या प्रकारामुळे इतर मृतदेहांची ओळख पटवण्यात चुका झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक मृतदेहांवर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ब्रिटनमधील कुटुंबियांचे म्हणणे आहे की अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह शवपेटी आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये देण्यात आले होते. मृतदेहांच्या कंटेनरवर लेबल्स चिकटवले होते, ज्यावर नावे लिहिलेली होती. मृतदेह जास्त जळाल्यामुळे, नातेवाईकांना कंटेनर किंवा शवपेट्या उघडण्यास मनाई केली होती.

दरम्यान, ब्रिटनमधील पीडित कुटुंबांनी त्यांच्या खासदारांशी, परराष्ट्र कार्यालयाशी, पंतप्रधानांशी आणि परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयांशी संपर्क साधून एअर इंडियाला उत्तर मागितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान केयर स्टारमर या प्रकरणी थेट चर्चा करतील असं म्हटलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे  ब्रिटिश कुटुंबांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादUnited Kingdomयुनायटेड किंग्डम