शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
3
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
4
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
5
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
6
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
7
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
8
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
9
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
10
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
11
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
12
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
13
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
14
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
15
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
16
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
17
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
18
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
19
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
20
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:22 IST

गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते.

नवी दिल्ली : गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते. मात्र, यंदा संपूर्ण दिल्लीतून केवळ ११ व्यापा-यांना फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाने ९८ पैकी ८७ अर्ज बाद करताना केवळ ११ व्यापा-यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाके वापरण्याचे आदेश देताना व्यापा-यांना परवाना देण्यावर काही निर्बंध घातले होते. त्याचप्रमाणे परवाना देताना सर्व बाबी तपासण्यासही सांगण्यात आले होते.

परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २७ ते ३० सप्टेंबरचा कालावधी निश्चित केला होता. संपूर्ण दिल्लीतून केवळ ९८ व्यापा-यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते. नियमांची अंमलबजावणी न केल्याने अग्निशमन विभागाने ८७ अर्ज बाद केले. ११ व्यापा-यांना अस्थायी परवाने देण्यात आले आहेत. पक्के दुकान असणारे व्यापारी २४ दिवस आणि तात्पुरते दुकान असणारे व्यापारी १५ दिवस हरित फटाक्यांची विक्री करू शकणार आहेत. परवान्याचे अर्ज बाद केल्यामुळे व्यापा-यांमध्ये नाराजी आहे.

प्रदूषणात होणा-या वाढीमुळे पोलीस फटाके विक्री व्यापा-यांवर लक्ष ठेवून असणार आहेत. दिल्लीत दिवाळीत रात्री केवळ दोन तास फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फटाके वाजवण्यासाठी २५०० ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यंदा परवाना विभागाने दिल्ली महापालिका, दिल्ली  कॅन्टोन्मेंट या संस्थांना पत्र लिहून फटाके वाजवण्यासाठी जागा वाढवण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रदूषण पसरवणारे फटाके उडवणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी ६० लोकांना प्रदूषण पसरवणारे फटाके विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  
फटाके उडवण्याबाबत जनजागृती
प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये फटाके उडवण्याबाबत जनजागृती करणार आहेत. लोकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच हरित फटाके उडवावेत यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. पत्रके वाटून हरित फटाके उडवण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. सामान्य फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतो. मात्र, हरित फटाके उडवल्यानंतर बाहेर पडणा-या विषारी वायूचे प्रमाण कमी असते.