शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

अटल पेन्शन योजनेसाठी 51. 33 लाख लोकांनी केली नोंदणी

By अोंकार करंबेळकर | Published: August 26, 2017 1:56 PM

केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छ भारत योजनेसाठी यावर्षी 7856 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअटल पेन्शन योजनेत 1883.93 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.या योजनेसाठी 2015-16 या वर्षासाठी केंद्र सरकारने 105.46 कोटींचे योगदान दिले आहे.

मुंबई, दि.26- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकार 2015 साली अर्थसंकल्पामध्ये अटल पेन्शन योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. या योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे स्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीला पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने दिलेल्या उत्तरात ही आरडेवारी स्पष्ट झाली आहे.

प्रफुल्ल सारडा यांनी अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत किती खाती उघडण्यात आली, त्यामध्ये किती पैसे जमा झाले आणि त्यामध्ये सरकारचे योगदान काय असे तीन प्रश्न विचारले होते. त्याला मिळालेल्या उत्तरामध्ये 51. 33 लाख लोकांनी खाती सुरु केल्याचे आणि त्यामध्ये 1883.93 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 2015-16 या वर्षासाठी केंद्र सरकारने 105.46 कोटींचे योगदान दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत योजनेसाठी 7856 कोटींची तरतूद

अटल पेन्शन योजनेप्रमाणेच स्वच्छ भारत योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येताच जाहीर केलेली योजना आहे. गंगा नदी शुद्धीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता या दोन विषयांवर त्यांनी विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केले. प्रफुल्ल सारडा यांनी पंतपर्धान कार्यालयाला विचारलेल्या दुसऱ्या एका माहिती अर्जामधून स्वच्छ भारत योजनेसाठी 2016-17 वर्षासाठी 7856 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मिळाली आहे, 2015-16 या वर्षासाठी 6392.95 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केली गेली होती  व प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 9370 कोटी रुपये खर्च केले गेले तर त्याआधीच्या वर्षी 2730 कोटी रुपयांची स्वच्छ भारतसाठी तरतूद केली गेली होती व 3094 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले होते. ही आकडेवारी पाहता 2020 पर्यंत  'स्वच्छ भारत'चे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने भारत पावले टाकत आहे अशा शब्दांमध्ये प्रफुल्ल सारडा यांनी समाधान व्यक्त केले आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करत आहेत, आगामी काळामध्ये गुंतवणुकदारांची संख्या वाढेल अशी अपेक्षा सारडा यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Indiaभारत