शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत ३०० गजाआड

By admin | Updated: March 21, 2015 23:58 IST

खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शालांत परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याची कबुली देताना यामुळे राज्याच्या प्रतिमेची हानी झाल्याचे म्हटले आहे.

पाटणा : बिहारमधील कॉपीविरोधी मोहिमेत शनिवारपर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शालांत परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याची कबुली देताना यामुळे राज्याच्या प्रतिमेची हानी झाल्याचे म्हटले आहे. ‘परीक्षा मे कदाचार के कारण जगहसाई हुई हैं... हमने कदाचार रोकने के लिये कारवाई के आदेश दिये है, (परीक्षेत प्रचंड प्रमाणात कॉपी झाल्याच्या वृृत्तांमुळे बिहारची सगळीकडे नाचक्की झाली आहे. मी कॉपी रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत.) असे नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कॉपीमुक्त शालांत परीक्षेच्या आदेशाचा परिणाम आज दिसून आला. पोलिसांनी परीक्षा केंद्राबाहेरून कॉप्या पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३०० जणांना अटक केली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, एकट्या वैशाली जिल्ह्यात १५० जणांना अटक करण्यात आली असून त्यात परीक्षार्थींचे पालक आणि नातेवाईकांचा समावेश आहे. शालांत परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करण्यात सर्वात पुढे अशी वैशाली जिल्ह्याची कुख्याती झाली आहे. आपल्या मुलाला कॉपी पुरविण्यासाठी पालक तीन व चार मजली इमारत चढत असल्याचे गाजलेले छायाचित्र याच जिल्ह्यातील आहे. (वृत्तसंस्था)४झाशी : बिहार शालांत परीक्षेतील सामूहिक कॉपीवरून वाद निर्माण झाला असतानाच परीक्षेत गैरप्रकार न करू दिल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकाला मारहाण केल्याची घटना झाशी येथे घडली. विशेष म्हणजे आरोपी हा एका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. ४स्थानिक बिपीन बिहारी कॉलेजचा बी. एस्सी.चा विद्यार्थी असलेल्या राहुलने कॉपी न करू दिल्यामुळे प्राध्यापकास मारहाण केली. १७ मार्च रोजी झालेल्या या मारहाणीत राहुलचे काही साथीदारही सहभागी होते. पोलिसांनी राहुलला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अहवाल मागवणार४पाटणा : बिहारमध्ये शालांत परीक्षेत मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी झाल्याच्या वृत्ताबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय राज्य सरकारकडे अहवाल मागविणार असल्याचे या खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी शनिवारी सांगितले. केंद्र या मुद्यावर राज्याकडून अहवाल मागून राज्याला कॉपीमुक्त करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचवेल, असे ते म्हणाले.