शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:02 IST

ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचं नाव आघाडीवर होतं. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचं सरकार बनू शकलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खांद्यावर नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी की ३० वर्षांपूर्वी त्यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याकडेही याच मंत्रालयाची म्हणजेच नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. (30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry)

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

माधवराव शिंदे हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत होते. १९९१ ते १९९३ या काळात माधवराव यांनी नागरी उड्डाण मंत्री आणि पर्यटन मंत्रालयाच्या मंत्रिपदाचं काम पाहिलं होतं. याच काळात देश राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाच्या महत्वाच्या टप्प्यावर होता. भारतानं त्यावेळी जागतिकीकरणाचा स्वीकार केला होता. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक काळात माधवराव यांनी देशाच्या उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. आता ज्योतिरादित्य शिंदे देश कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरं जात असताना नागरी उड्डाणमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. 

ज्योतिरादित्य आणि माधवराव दोघांनीही नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याआधी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. माधवराव यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संचार आणि आयटी मंत्रिपदाचं कामकाज पाहिलं आहे. देशातील पोस्ट व्यवस्थेला पुनरुज्जीवीत करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. 

२००२ साली ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. वडील माधवराव यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १८ सप्टेंबर २००१ साली माधवराव यांचा एका हवाई प्रवासातील दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यावेळी माधवराव गुना मतदारसंघाचे खासदार होते. ज्योतिरादित्य शिंदे याच मतदार संघातून २००२ साली पहिली निवडणूक लढले आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त करुन संसदेत पोहोचले होते. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदी