शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:02 IST

ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचं नाव आघाडीवर होतं. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचं सरकार बनू शकलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खांद्यावर नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी की ३० वर्षांपूर्वी त्यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याकडेही याच मंत्रालयाची म्हणजेच नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. (30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry)

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

माधवराव शिंदे हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत होते. १९९१ ते १९९३ या काळात माधवराव यांनी नागरी उड्डाण मंत्री आणि पर्यटन मंत्रालयाच्या मंत्रिपदाचं काम पाहिलं होतं. याच काळात देश राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाच्या महत्वाच्या टप्प्यावर होता. भारतानं त्यावेळी जागतिकीकरणाचा स्वीकार केला होता. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक काळात माधवराव यांनी देशाच्या उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. आता ज्योतिरादित्य शिंदे देश कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरं जात असताना नागरी उड्डाणमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. 

ज्योतिरादित्य आणि माधवराव दोघांनीही नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याआधी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. माधवराव यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संचार आणि आयटी मंत्रिपदाचं कामकाज पाहिलं आहे. देशातील पोस्ट व्यवस्थेला पुनरुज्जीवीत करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. 

२००२ साली ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. वडील माधवराव यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १८ सप्टेंबर २००१ साली माधवराव यांचा एका हवाई प्रवासातील दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यावेळी माधवराव गुना मतदारसंघाचे खासदार होते. ज्योतिरादित्य शिंदे याच मतदार संघातून २००२ साली पहिली निवडणूक लढले आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त करुन संसदेत पोहोचले होते. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदी