शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

ज्योतिरादित्य शिंदे: ३० वर्षांपूर्वी वडिलांकडे होती नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी; आता मुलाकडेही तेच खातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:02 IST

ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचं नाव आघाडीवर होतं. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशात भाजापाचं सराकर आणण्यासाठी दिलेल्या योगदानंचं बक्षिस म्हणून मोदी सरकारनं त्यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं.

मार्च २०२० मध्ये आपल्या समर्थक आमदारांसह ज्योतिरादित्य शिंदे भाजापमध्ये दाखल झाले. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपचं सरकार बनू शकलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खांद्यावर नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी की ३० वर्षांपूर्वी त्यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याकडेही याच मंत्रालयाची म्हणजेच नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. (30 years ago father madhaorao scindia was civil aviation minister now son jyotiraditya is handling this ministry)

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

माधवराव शिंदे हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत होते. १९९१ ते १९९३ या काळात माधवराव यांनी नागरी उड्डाण मंत्री आणि पर्यटन मंत्रालयाच्या मंत्रिपदाचं काम पाहिलं होतं. याच काळात देश राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाच्या महत्वाच्या टप्प्यावर होता. भारतानं त्यावेळी जागतिकीकरणाचा स्वीकार केला होता. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक काळात माधवराव यांनी देशाच्या उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. आता ज्योतिरादित्य शिंदे देश कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरं जात असताना नागरी उड्डाणमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. 

ज्योतिरादित्य आणि माधवराव दोघांनीही नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याआधी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. माधवराव यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संचार आणि आयटी मंत्रिपदाचं कामकाज पाहिलं आहे. देशातील पोस्ट व्यवस्थेला पुनरुज्जीवीत करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. 

२००२ साली ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. वडील माधवराव यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १८ सप्टेंबर २००१ साली माधवराव यांचा एका हवाई प्रवासातील दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यावेळी माधवराव गुना मतदारसंघाचे खासदार होते. ज्योतिरादित्य शिंदे याच मतदार संघातून २००२ साली पहिली निवडणूक लढले आणि तब्बल साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त करुन संसदेत पोहोचले होते. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदी