शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:25 AM

२०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशात कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी वेगाने वाढत आहेत. दरवर्षी १५ लाख लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८ लाख प्रतिवर्ष झाली आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहेत.आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, २०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे. चौबे यांनी लोकसभेत सांगितले की, केवळ २०१८ मध्ये कॅन्सरपीडितांची संख्या ४३ लाख ६३ हजार आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कॅन्सरचे १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्ण नोंद झाले आहेत.

याशिवाय वर्ष २०१७ मध्ये १५ लाख १७ हजार आणि वर्ष २०१६ मध्ये १४ लाख ५१ हजार रुग्ण समोर आले आहेत. सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात आढळून आले आहेत. त्यानंतर कॅन्सरपीडितांची सर्वाधिक संख्या बिहार आणि महाराष्ट्रात आहे. कॅन्सरवरील उपाययोजनांबाबत चौबे यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर याला राष्ट्रीय कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग नियंत्रण कार्यक्रम बनविण्यात आले. याअंतर्गत लवकरात लवकर निदान, उपचार यासाठी देशात जिल्हा स्तरावर ६१६ क्लिनिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ३,८२७ क्लिनिक स्थापन करण्यात आले. याशिवाय केमोथेरपीसाठी २१४ डे केअर केंद्रे बनविण्यात आली आहेत.रोगावर मात करण्यासाठी उपाययोजनाकॅन्सरच्या तिस-या स्टेजच्या देखभालीसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. यानुसार १९ राज्य कॅन्सर संस्था आणि २० कॅन्सर केंद्रांची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत एम्स आणि दुसºया संस्थांमध्येही शास्त्रीय अभ्यासावर लक्ष दिले जात आहे. हरयाणात राष्ट्रीय कॅन्सर संस्था आणि कोलकात्यात चितरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचा विकास करण्यात येत आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारतHealthआरोग्य