शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 15 जणांचा मृत्यू; 133 इमारती कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:07 IST

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देसलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.तब्बल 133 इमारती कोसळल्या असल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 14 जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तब्बल 133 इमारती कोसळल्या असल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. 133 इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून  सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, लखीमपूर खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पीलीभीत, सोनभद्र, चंदौली, फिरोजाबाद, मऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच परिसराचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसांत उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

आसाममध्ये देखील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माम झाली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. जवळपास चार लाख लोकांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने  धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्ह्यांना पावसाचा फटका बसल्याची माहिती दिली आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊसDeathमृत्यू