शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मनसे टवाळखोर हटविणार मग, पोलीस यंत्रणा कमी पडतेय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:28 IST

नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देनाशिकमधील स्थितीमुलींच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर

संजय पाठक, नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार करण्याची गरज आहे.

मुली आणि महिलांवरील अत्याचार कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर समाज जागृत झाला असे वाटले असले तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. हिंगणघाट येथील घटनेनंतर आता पुन्हा महिलांवरील अत्याचार याबाबत चर्चा सुरू झाली. शासकिय यंत्रणा अत्याचार प्रतिबंधासाठी काही करीत नाही अशातला भाग नाही परंतु त्या पुरेही पडत नाही असेही दिसून येते. नाशिकमध्येच विचार केला तर ठिकठिकाणी युवतींवर अत्याचार होऊ नये अथवा आपत्कालात त्यांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथक सज्ज आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तर डिकॉय नामक अभिनव प्रकार राबविला. रात्री बेरात्री महिलांची छेडखानी करू पहाणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी महिला पोलीसांनाच सामान्य महिला म्हणून उभे केले. पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी अलिकडेच नाशिक सिटीजन फोरमच्या कार्यक्रमात आतापर्यंत तेरा हजार टवाळखोरांवर कारवाई केल्याची धक्कादायक माहिती दिली. परंतु इतके करूनही युवतींच्या छेडखानीला प्रतिबंध बसलेला नाही.

 गेल्या आठवड्यात मनसेच्या मनोज घोडके आणि काही कार्यकर्त्यांनी सारडा कन्या विद्यालयाच्या बाहेर मुलींची छेड काढणा-या काही टवाळखोरांना पळवून लावले. तत्पूर्वी त्यांना चांगलाच प्रसादही दिला. मनसेची खळ्ळ खट्याक ची आक्रमक भूमिका नेहेमीच सर्वांना आकर्षीत करत आली आहे त्यामुळे आता अशाप्रकारचे आणखी काही शाळांबाहेर अशाप्रकारे मोहिम राबविणार असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यानी जाहिर केले. मनसेने कायदा हातात घेणे कितपत उपयुक्त अशी चर्चा या निमित्ताने झडू शकेल. परंतु शहरात अशी अनेक शाळा महाविद्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या बाहेर टवाळखोरांचा उपद्रव सुरू असेल तर मग पोलीस यंत्रणेने टवाळखोरांना धडे शिकवूनही काहीच पदरात पडले नाही काय असा प्रश्न निर्माण होतो.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMNSमनसे