शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटारीचे पाणी घरात

By admin | Updated: August 5, 2016 01:20 IST

गंगापूररोड : ...तर परिस्थिती उद्भवलीच नसती

नाशिक : पावसाळी गटारी योजनेचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे गंगापूररोड परिसरातील नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी (दि. १) आणि मंगळवारी (दि.२) झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूररोड येथील कमल रो-हौसिंग सोसायटी तसेच अशोका ‘अ’ आणि अशोका ‘ब’ इमारतीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. घरातील महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजली असून, स्वयंपाक खोलीचीदेखील वाताहत झाली आहे.गंगापूररोड परिसरातील खतीब डेअरीच्या मागील बाजूस सांडपाणी वाहून जाणारा नाला असून, या नाल्यामधील चेंबर्स फुटल्याने सांडपाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण होत आहे, परिणामी मुसळधार पावसात या नाल्याच्या काठी असणाऱ्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महात्मानगर, कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरातील सांडपाणी भुयारी गटारीतून याच ठिकाणी येत असल्याने येथील रहिवाशांच्या समस्येत वाढ झाली आहे. या नाल्यातील चेंबर फुटले असून, चेंबरची आणि चेंबरला जोडणाऱ्या पाइपालाइनची दुरुस्ती करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्थानिक आमदार तथा नगसेवक देवयानी फरांदे यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर महापलिका प्रशासनातर्फे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परिसरात येऊन पाहणी करण्यात आली. ही पाहणी निव्वळ फार्सच ठरल्याचे पुरावरून स्पष्ट झाले आहे.या नाल्यामध्ये शहारातील विविध ठिकाणांवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वळण देणे अपेक्षित होते, परंतु शासकीय अनास्थेमुळे हे पाणी येथेच सोडण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पावसाळ्याव्यतिरिक्तही येथील स्थानिक नागरिक दुर्गंधी, डासांच्या समस्येने त्रासलेले असतात. कमल रो-हौसिंग सोसायटीसह अशोका ‘अ’ आणि अशोका ‘ब’ या इमारतीतील तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात छातीपर्यंत पाणी साचले होते. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील रहिवाशांना बचावासाठी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. इमारतीतील रहिवासी गंगाधर जोशी (८४) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत खचली असून, ही भिंत प्रशासनाने बांधून देण्याची तसेच पुन्हा अशी आपत्ती रहिवाशांवर येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. घरातील पुरूषवर्ग कामानिमित्त घराबाहेर असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी इमारतीजवळ असलेल्या मोरीला जेसीबीच्या सहाय्याने भगदाड पाडून पाण्याचा निचरा करण्यात आला.