शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे पूर्ण करण्यास लागणार आणखी दोन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:49 IST

नाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे पूर्ण करण्यास गती दिली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ठळक मुद्देमोठ्या क्षेत्रामुळे विलंब : दोन लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे पूर्ण करण्यास गती दिली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील पीक पंचनामे दि. ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात पीक पंचनामे करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्ह्यातही संपूर्ण यंत्रणा पंचनामा कामात गुंतली असून प्रत्यक्ष शेतांवर जाऊन वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. सुमारे ३ लाखांच्या जवळपास पीक नुकसानीचे क्षेत्र असल्यामुळे पंचनामे करण्यास काहीसा विलंब होत असला तरी येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केला आहे.
अनेक तालुक्यांमध्ये १२ तासांमध्ये १५० हून अधिक मिमी पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वातीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहेत. पंचनामे करताना जिरायती, बागायती तसेच बहुवार्षिक फळबागा अशा तीन टप्प्यांत पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्णातील संपूर्ण नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पंचनाम्यांची कामे जलदगतीने सुरू आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच चक्रीवादाळाचेदेखील सावट असल्याने पंचनामे पूर्ण करण्याच्या कामात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.चक्रीवादळाचा धोका टळल्यामुळे पंचनामे करण्याच्या कामाला अधिक गती दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशाासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे अचूक होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेदेखील आदेश देण्यात आले आहेत. एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि ग्रामसेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी