शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यावरच भागविली जातेय तहान!

By admin | Updated: May 1, 2016 01:07 IST

सायखेडा व राजगावात पाणी पेटले; टँकर न पाठविल्यास ‘रास्ता रोको’.

शिखरचंद बागरेचा / वाशिमवाशिम तालुक्यातील सायखेडा व राजगाव येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. गावालगतच्या एका विहिरीतील गढूळ व दूषित पाण्यानेच नागरिकांना तहान भागवावी लागत असल्याने साथरोग उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पर्यावरणाचा र्‍हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतुमानात बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईच्या दाहकतेत होरपळून निघत आहेत. वाशिम तालुक्यातील सायखेडा, राजगाव परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, तळ गाठलेल्या विहिरीतील गढळू पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पाणी शुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध असणार्‍या नागरिकांचा अपवाद वगळता उर्वरित नागरिकांना गढूळ पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे. शेतामधून पाच किमी अंतरावरून महिला व पुरुषांना पाणी आणावे लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या सायखेडा गावातील सर्व पाणवटे, विहीर, कूपनलिका आदी पाण्याचे स्रोत आटले असून, काही ठिकाणचे पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य नाही. तथापि, पर्यायी व्यवस्था नसल्याने गढूळ पाण्यात ह्यजीवन ड्रॉपह्ण टाकून पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सायखेडचे रहिवासी अरविंद अहिरे पाटील यांनी २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देऊन सायखेडा व राजगाव येथील भीषण परिस्थिती कथन केली. दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी सायखेडा व राजगाव येथे तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी अहिरे यांच्यासह गणेश वायचाळ, गजानन वानखेडे, गणेश देशमुख, दामू कव्हर आदी ग्रामस्थांनी केली.