शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांबांमुळे वाहतुकीला अडथळा

By admin | Updated: April 30, 2017 00:38 IST

कळवण : बी. के. कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले रोहित्र रस्त्यांच्या विकासाला डोकेदुखी ठरत असून, ते हटवावे, अशी अपेक्षा मागणी नागरिकांनी केली आहे.

 कळवण : कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिर या रस्त्यावरील बी. के. कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले रोहित्र रस्त्यांच्या विकासाला डोकेदुखी ठरत असून, ते हटवावे, अशी अपेक्षा मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपंचायत असलेल्या कळवण शहराचा दिवसागणिक विस्तार वाढत आहे. त्यामानाने शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब व रोहित्र हे अडथळा ठरू पाहत असल्याने त्यांचे सर्वेक्षण करून सदर खांब व रोहित्र हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजीनगरमधील बी. के. कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. रोहित्र अगदी रस्त्यावरच असल्याने जवळून जातानादेखील जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी आलेले पाहुणे रोहित्राभोवतीच वाहने लावत असल्याने येथे दुतर्फा वाहतुकीची कोंडी होते. येथूनच पुढे असलेल्या डॉ. वाघ हॉस्पिटलजवळ हीच स्थिती आहे. शिवाजीनगरमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम नगरपंचायतने हाती घेतले असून रस्त्यांच्या रुंदीकरणास अडथळे ठरू पाहत असलेले रोहित्र व वीजखांब वीज वितरणने अन्यत्र हलवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे .डॉ. वाघ हॉस्पिटलसमोर रामदास दशपुत्रे यांचे दुकान व घराच्या बांधकामामुळे रस्ता अतिशय अरुंद स्वरूपाचा झाला आहे. एकाच वेळी दुसरे वाहन पास होणे दुरापास्त आहे. येथील औषध दुकानाजवळील एकूण चार वीजखांब वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. याच रस्त्यावर पुढे जवळपास ५ ते ६ खांब आहेत. सिद्धिदाता हॉस्पिटलमध्ये तातडीचे रुग्ण आल्यानंतर अरुंद झालेल्या रस्त्यामुळे व विजेच्या खांबांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहे. हॉस्पिटलसमोर रुग्णांची त्यांच्या नातेवाइकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहनचालकांना तेथून मार्ग काढणे अवघड होत आहे. दुरून दुसऱ्या मार्गाचा अवलंब करीत वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने नियोजन करून अडथळा निर्माण करणाऱ्या वीजखांबांचे सर्वेक्षण करून येथील ते इतरत्र हलवावे तसेच येथील अनावश्यक विजेचे खांब कमी करता येणे शक्य असल्याने या कामात यंत्रणेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिद्धिदाता हॉस्पिटलच्या पुढे कलावती मंदिराकडे जाताना रस्त्याच्या बाजूला रोहित्र उभे असून, त्या समोरील मालपुरे बंधंूनी रस्त्यावरच घरे बांधली असल्याने रोहित्र आणि अतिक्रमित घरामुळे रस्ता अरुंद झाला आहे. एकाच वेळी दोन वाहने पास होणे अवघड झाले आहे. रस्त्याला लागूनचे रोहित्र असल्याने भीती वाटते. हे रोहित्र डोकेदुखी ठरत आहे. उपयुक्त नसलेले वीज खांबही अजूनही ‘जैसे थे’ उभे आहेत.शहरातील अनेक ठिकाणच्या खांबांची दुरवस्था झाली आहे. काही खांब वाकले आहेत, तर काही जीर्ण झाले आहेत. शहरात सर्वत्र सीमेंटचे जंगल (घर, बंगले) झाल्याने रस्तेदेखील सीमेंटची झाली आहेत. पर्यायाने रस्त्यांची उंची वाढल्याने शहरात वीजपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या वीज तारा खाली आल्या आहेत. त्यामुळे कळवण शहरातील विविध भागांचे वीज वितरण कंपनीने सर्वेक्षण करून उपाययोजना केली तर बहुतांशी विजेचे खांब काढता येणे शक्य असल्याचे मत कळवणकरांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)