शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कु-हेगाव येथे रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 3:46 PM

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला आदी भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला आदी भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून इगतपुरी तालुक्यातील कुर्हेगाव येथील नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यांवर नेहमीच वाहनधारकांची वर्दळ असल्याने हा रस्ता पुर्णत: खचला आहे. या रस्त्यावर पथदीप नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य स्वाती गव्हाणे, मनीषा धोंगडे, ताराबाई पवार तसेच सोपान शिंदे, शिवसेनेचे गणप्रमुख आंबादास धोंगडे आदींनी केली. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याची बेलगाव कुºहेपासून ते गोंदे दुमाला फाट्यापर्यत अतिशय चाळण झाली असून या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, तसेच दैनंदिन रोजगारासाठी शेकडो कामगार गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जात असतात.तसेच काही कामगार हे राञपाळी करून घरी जात असतात.परंतू या खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी तसेच संपूर्ण रस्त्यावर पथिदप नसल्यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरु स्ती होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना मणक्याचे आजार, पाठदुखी, असे विविध आजारांची लागन होत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक