शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारावरून आरोग्य, ग्रामविकासमध्ये जुंपणार

By admin | Updated: September 7, 2016 01:06 IST

रजा मंजुरी घोटाळा : जिल्हा परिषद लिहिणार पत्र

 नाशिक : साधारणत: २२ वर्षांपूर्वी १९९४ साली शासनाने काढलेल्या निर्णयाचा आधार घेऊन जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा मंजुरीचे अधिकार आपल्याकडे ठेवू पाहणाऱ्या आरोग्य उपसंचालकांना जिल्हा परिषद प्रशासनाने आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाला पत्रव्यवहार करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण प्रमुख म्हणून कार्यरत ठेवावे, त्याबाबत आरोग्य उपसंचालकांना नेमक्या कोणत्या नियमानुसार रजा मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले? यासह अन्य बाबींचा ऊहापोह या पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे प्रशासन राज्य सरकारकडे करणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच माहितीच्या अधिकारान्वये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा मंजुरीचा घोटाळा जिल्हा परिषदेत उघड झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन अशी नियमबाह्ण परस्पर रजा मंजूर करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनातूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच रजा मंजुरीच्या प्रकरणात काही अनियमितता झाली असेल, तर संबंधितांकडून अशा अनियमितता झालेल्या रकमेची वसुली करण्याचा ठरावही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. मोहाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. पी. सावंत यांची ६१ दिवसांची दीर्घकालीन रजा अधिकार नसताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी परस्पर मंजूर करून सुमारे दीड ते दोन लाखांचे रजा मंजुरीची देयके काढली. वस्तुत: रजा मंजुरीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थायी समितीला असताना त्यांच्या अधिकारावर गदा आणून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर रजा मंजूर केल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला होता. निफाड तालुक्यातील आरोग्यसेविकांच्या नियमबाह्ण बदल्याही आता चर्चेत आल्या आहेत. (प्रतिनिधी)