शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे रब्बीची आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला ...

मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमीन पिकांसह वाहून गेल्या होत्या. नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली आहे. परतीच्या पावसामुळे आजही नद्यांना काही प्रमाणात पाणी आहे लहान-मोठी बंधारी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतीच्या उपयोगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव गेल्या हंगामातील नुकसानाची आर्थिक तूट भरून निघेल, या आशेने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. लोकडाऊननंतर वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे साहजिकच लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याबरोबरच गहू, हरभरा, भुईमूग, काही ठिकाणी मका लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांसाठी वातावरण पोषक राहिले नाही, त्यातच अचानकपणे थंडी, ढगाळ वातावरण, धुके, दवं, अधूनमधून बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. या साऱ्या खराब वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अभ्रच्छादित वातावरणामुळे पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असून, अपुरा सूर्यप्रकशामुळे कोवळी पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचे सावट दिसून येत आहे. खरीपातील झालेल्या नुकसानीची जखम ताजी असताना अशा आसमानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जातो की काय, याचे संकेत मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.