शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल परभणीचा बाह्य वळण रस्ता

By admin | Updated: December 15, 2015 23:45 IST

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़ कामाला योग्य गती मिळाल्यास दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिली़
शहराच्या विकासाचा घटक असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून रखडले होते़ या रस्त्याच्या प्रश्नावर शासकीय स्तरावरही एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याने परभणी शहरातील पत्रकारांनी या प्रश्नी पुढाकार घेतला़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांची भेट घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर एकत्रित माहिती घेऊन बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले़ त्याचाच एक भाग म्हणून बाह्य वळण रस्त्याच्याशी संदर्भात सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि पत्रकारांची संयुक्त बैठक दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी रस्त्या संदर्भात माहिती दिली़ ते म्हणाले, बाह्य वळण रस्त्याचे सर्वेक्षण भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे़ त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे़ रस्त्यासाठी भुसंपादन हा महत्त्वाचा प्रश्न असून, भुसंपादनासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध आहे़ राजपत्रात समावेश झाल्याने जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडून संयुक्त मोजणी केली जाणार असून, मोजणीनंतर प्रत्यक्षात भुसंपादनाच्या कामाला प्रारंभ होईल़ भुसंपादन कामासाठी योग्य गती राखली तर आगामी दोन वर्षांमध्ये बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला़ या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कर्णेवार, जिल्हा भूसंपादन अधिकारी एस़एच़ मावची, पत्रकार अशोक कुटे, सुरेश जंपनगिरे, धनाजी चव्हाण, विशाल माने, प्रभु दिपके, अनिल दाभाडकर, विनोद कापसीकर, बंडू बनसोडे, सुमन उफाडे, आबासाहेब कड, मुंदडा आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरापासून बाह्य वळण रस्ता झाल्यानंतर शहराच्या विस्तारीकरणाचे आणि विकासाचे मार्ग मोकळे होणार आहेत़ त्यामुळेच पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरला आहे़ (प्रतिनिधी)