शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST

राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले होते.

शैलेश कर्पे, सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद मिळाले होते तर आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. सिन्नरच्या राजकारणात मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या उभय नेत्यांमधला राजकीय प्रवास कधी मैत्रीचा सुगंध देणारा तर कधी पराकोटीचा संघर्ष करणारा आणि शेवटी गोडवा देणारा ठरला. मात्र, गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तुकाराम दिघोळे यांच्या पश्चात कोकाटे यांना मात्र या निकालाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकप्रकारे आव्हानच उभे केले आहे.

१९८५ साली तुकाराम दिघोळे समाजवादी काँग्रेसकडून आमदार झाले, त्यावेळी माणिकराव कोकाटे अतिशय युवा कार्यकर्ते होते. कोकाटे काँग्रेसचे विचाराचे असल्याने या निवडणुकीत त्यांनी दिघोळे यांच्या विरोधात काम केले होते. पुढे समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन झाल्यानंतर कोकाटे आणि दिघोळे एकत्र आले. १९९०च्या निवडणुकीत कोकाटे यांनी दिघोळे यांचा प्रचार केला. दिघोळे दुसऱ्यांदा आमदार झाले. पूर्व भागातील मराठा युवा कार्यकर्ता मिळाल्याने दिघोळे-कोकाटे मैत्री फुलली. याच काळात कोकाटे यांना दिघोळे यांच्या शिफारसीवरूनच मुख्यमंत्री कोट्यातून विसे मळा याठिकाणी सदनिका मिळाल्याची चर्चा होती. १९९२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत माणिकराव कोकाटे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य झाले आणि सिन्नर पंचायत समितीचे सभापती झाले. कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतिपदही मिळविले. या काळात कोकाटे यांचा संपर्क अॅड. भगीरथ शिंदे यांच्यासोबत जवळून आला. १९९५ ला दिघोळे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली तर कोकाटे यांनी भगीरथ शिंदे यांना मदत केली. कोकाटे पंचायत समितीचे सभापती असताना दिघोळे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. कोकाटे यांनी पंचायत समितीच्या सभापतिपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्वास आणला गेला. दिघोळे यावेळी युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. कोकाटे यांनी बाबूराव आव्हाड नामक पंचायत समिती सदस्य यांना अज्ञातस्थळी हलवून अविश्वास ठराव फेटाळून लावला. येथूनच दिघोळे-कोकाटे संघर्षाला प्रारंभ झाला. याच काळात दिघोळे यांनी सरकारी कोट्यातून मिळालेल्या सदनिकेची चौकशी लावल्याचे समजते. त्यांनतर कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

पाच वर्षे दिघोळे-कोकाटे संघर्ष पेटतच राहिला. पुन्हा २००४च्या निवडणुकीत दिघोळे-कोकाटे आमने-सामने आले. दुसऱ्यांदा कोकाटे यांनी दिघोळे यांना विधानसभा निवडणुकीत २० हजारांच्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर २००९ विधानसभा निवडणुकीत प्रकाश वाजे आणि कोकाटे यांच्यात यावेळी दिघोळे यांनी प्रकाश वाजे यांचे काम केले. मात्र, वाजे पराभूत झाले. सुमारे दोन दशके दिघोळे-कोकाटे संघर्ष सिन्नरकरांनी अनुभवला. त्यानंतर शेवटच्या काळात दिघोळे-कोकाटे यांच्यात गोडवा निर्माण झाला. २०१४च्या निवडणुकीत दिघोळे हे कोकाटे यांच्या व्यासपीठावर आले. तथापि, या निवडणुकीत कोकाटे पराभूत झाले आणि राजाभाऊ वाजे आमदार झाले. अगोदर विरोधक नंतर मैत्री पुन्हा दोन दशके जोरदार राजकीय संघर्ष आणि शेवटी गोडवा, असा दिघोळे-कोकाटे राजकीय जीवनपट सिन्नरकरांनी अनुभवला. राज्यमंत्री असताना दिघोळेंचा पराभवदिघोळे राज्यमंत्री असताना १९९९ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेला दंड थोपटले आणि शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली. राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले. यावेळी सिन्नर तालुक्याला दिघोळे-कोकाटे यांच्यातील तीव्र संघर्ष अनुभवायला मिळाला. यावेळी नायगाव जिल्हा परिषद गटातूनही दिघोळे यांच्या पत्नी आशाताई दिघोळे यांना नायगाव गटातून पराभूत करण्यासाठी कोकाटे यांनी जंग जंग पछाडले व पराभूत केले.

टॅग्स :NashikनाशिकManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार