शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नारायण नागबलीचे विधी ३० पासून

By admin | Updated: September 26, 2015 22:57 IST

पर्वकाळ समाप्ती : कुंभमेळ्यामुळे बंद ठेवलेले विधी सुरू होऊन व्यवहार येणार पूर्वपदावर

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील तृतीय आणि अखेरची शाही पर्वणी पार पडल्यानंतर आता शहरातील पुरोहितांचे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येणार असून, येत्या ३० सप्टेंबरपासून नारायण नागबलीचे विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पुरोहित पद्माकरशास्त्री मुळे यांनी दिली.नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन पर्वण्या पार पडल्या. त्र्यंबकेश्वर याठिकाणी कालसर्पयोग, त्रिपिंडी याप्रमाणेच नारायण नागबली, नारायण बलीचे विधी केले जातात. प्रामुख्याने, नारायण नागबलीचा विधी हा जगाच्या पाठीवर केवळ त्र्यंबकेश्वर याठिकाणीच केला जातो. त्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील काही ठराविक पुरोहितांना निजामकाळापासून पौराहित्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पितृदोष घालविण्यासाठी नारायण नागबलीचा विधी करण्याची प्रथा आहे. सदर विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला देश-विदेशातून लोक येत असतात. त्यासाठी खास पॅकेजेस तयार करण्यात आलेली आहेत. त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण हे बव्हंशी अशा धार्मिक विधींवरच अवलंबून आहे. दरम्यान, १३ जुलैला त्र्यंबकेश्वरी आखाड्यांमध्ये ध्वजारोहण सोहळे पार पडले. तेव्हापासून त्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिने पुरोहितांनी नारायण नागबलीचे विधी बंद ठेवले होते. ज्याठिकाणी सदर विधी पार पाडला जातो तेथे आखाड्यांच्या साधूंचा निवास असल्याने पुरोहितांकडून विधी बंद करण्याचा निर्णय झाला होता. दोन महिन्यांच्या कुंभपर्वकाळात केवळ त्रिपंडी, कालसर्पयोगादी विधी पार पाडले गेले. आता पर्वणीकाळ संपुष्टात आल्याने बंद ठेवण्यात आलेले विधी पुन्हा सुरू होणार असून, येत्या ३० सप्टेंबरला पहिला मुहूर्त सांगण्यात आला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण पुन्हा एकदा गजबजणार आहे.