शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:11 IST

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे - चास -नळवाडी-कासारवाडी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. नांदूरशिंगोटे व चास ही दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असतानाही या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर नांदूरशिंगोटे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदिं गावे आहेत. सिन्नर व अकोले तसेच संगमनेर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरशिंगोटे ते चास या रस्त्याची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी डांबर उखडले आहे, तर अनेक ठिकाणी रस्ता अक्षरश: खचून गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या नांदूरशिंगोटे ते चास या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्याकडे दहा वर्षांत पुन्हा लक्ष देण्यात आलेले नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते.
सदर रस्ता पुढे अकोले व संगमनेर तालुक्यांत जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असते. तथापि, रुंदी कमी झाल्याने या रस्त्याने एकावेळी एकच वाहन चालण्यास जागा राहिली आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रसंग नित्याचे झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठीही हाच रस्ता सोयिस्कर असल्याने या मार्गे अवजड वाहनांचीही वर्दळ नेहमीचीच झाली आहे.
गेल्या वर्षी खासदार निधीतून या भागातील चास-नळवाडी, कासारवाडी-चास, नळवाडी-कासारवाडी आदि एकेक किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेले असतानाही त्यांची कामे अपूर्ण आहेत. या भागात दोन जिल्हा परिषद सदस्य असतांनाही रस्त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा होत नसल्याने भोजापूर खोरे व नांदूरशिंगोटे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदूरशिंगोटे ते चास या महत्त्वाच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जगनपाटील भाबड, शंकर सानप, आनंदा शेळके, शंकर शेळके, पोपट शेळके, शिवाजी दराडे, रावसाहेब दराडे, दीपक बर्के, बाळासाहेब देशमुख, सुनील खैरनार, संजय खैरनार, सुभाष दराडे, राजेंद्र शेळके, मंगेश शेळके, भारत दराडे, सुदाम आव्हाड आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)