शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत घोळ

By admin | Updated: October 12, 2015 21:32 IST

कळवण : नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या

कळवण : अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्वासाला तडा देण्याचे काम कळवणच्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने होतंय की काय, अशी शंका आता निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या उमटल्या आहेत. पाच दिवस उमेदवारांचे वाया गेले पाचव्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. शेवटी ही गंभीर तक्रार निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेली. शेवटी आयोगाने आॅन-लाइन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द केली व पूर्वीसारखीच छापील अर्ज भरण्याची मुभा दिली.आता फेरमतदानाचा प्रसंग टाळा कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यांवर प्रशासकीय गोंधळ स्पष्ट झाला आहे. या गोंधळाला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार, यापेक्षा संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरील विश्वास उडतो की काय, याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेबाबत ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी तीव्र संताप दिसून आला. त्यामुळेच महाआॅनलाइनच्या कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे. अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्वापार पद्धतीने राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याने इच्छुक उमेदवारांना न्याय मिळाला. आॅनलाइन सेवेचा अनुभव नसलेल्या आदिवासीबांधव व सर्वसामान्य उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले. आता प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल लागायचे आहेत. आतापर्यंत सर्वच प्रक्रि या पुन्हा नव्याने राबवाव्या लागल्या आहेत. ही निवडणूक आहे की पोरखेळ, अशी संतापाची भावना नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त झाल्याने मतदान आणि मतमोजणी तरी पुन्हा घ्यावी लागणार नाही ना, याची खबरदारी नगरपंचायत प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)