शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;

By admin | Updated: June 9, 2015 02:15 IST

महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्याने साधुग्रामसह अन्य कामे उरकण्याचे आव्हान एकीकडे पेलणाऱ्या प्रशासनाला नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनाही सांभाळण्याची कसरत करावी लागते आहे. महंतांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे प्रशासनाची करमणूकही होताना दिसून येत आहे. रविवारी पावसाने साधुग्रामची दाणादाण उडाल्यानंतर सोमवारी सकाळी ‘रामायण’वर औपचारिकपणे बोलताना महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला; मात्र तासाभरातच साधुग्राममध्ये झालेल्या पाहणी दौऱ्यात महंतांनी प्रशासनाला प्रशस्तिपत्रक बहाल केल्याने माध्यम प्रतिनिधींसह पदाधिकारी व अधिकारीही चकित झाले. तासाभरातच महंतांची दोन रूपं पाहायला मिळाली. रविवारी पावसामुळे तपोवनातील साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहांचे पत्रे उडून नुकसान झाले होते. याशिवाय ठिकठिकाणी पाणी साचून विजेचे खांबही वाकले होते. पहिल्याच पावसाने साधुग्रामची दैना उडाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. सोमवारी सकाळी साधुग्राममधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महापौरांनी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासही उपस्थित झाले. यावेळी ‘रामायण’वर माध्यम प्रतिनिधींसह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारीही हजर होते. याचवेळी महंतांनी प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजीचा सूर लावला. प्रशासनाकडून कमिशन घेतले जात असल्यानेच कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप करताना महंतांनी दहा मिनिटांच्या पावसाने एवढे नुकसान झाले, तर दोन तास पाऊस झाल्यास काय अवस्था होईल, अशी भीतीही व्यक्त केली. याचवेळी महंतांनी महापौरांचेही उपरोधिक स्वरात कान पिळले. महंतांचा नूर पाहून पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्गही तणावाखाली आला. पुढच्या दौऱ्यात काय वाढून ठेवले आहे, या भीतीखालीच तपोवनाकडे सर्वांनी प्रस्थान केले. साधुग्राममधील कामांची पाहणी केल्यानंतर महंतांचे मात्र सौम्य रूप समोर आले आणि सारेच अवाक् होतानाच अधिकारीवर्गाने सुटकेचा नि:श्वासही सोडला. ‘ये नैसर्गिक आपत्ती है, ऐसा थोडाबहुत कुछ होता रहेता है’ असे सांगत महंतांनी प्रशासनाकडून साधुग्राम उभारणीचे काम उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रक बहाल केले. याशिवाय आम्ही ३० जूननंतर येऊ तोपर्यंत कामांसाठी अवधीही देत असल्याचे सांगितल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. तासाभरापूर्वी प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या महंतांनी साधुग्राममध्ये मात्र मवाळ भूमिका घेतल्याने नेमकी काय जादू झाली, यावरच नंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)