शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्रीच उरले महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST

जळगाव नेऊर : शासनाने ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटावे या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती हा उपक्रम राबविला, काही ...

जळगाव नेऊर : शासनाने ग्रामीण भागातील तंटे गावातच मिटावे या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती हा उपक्रम राबविला, काही वर्ष या समितीचे कार्य चांगले चालले असल्याचे दिसून आले, शिवाय गावपातळीवर याचा चांगल्या प्रकारे प्रभाव निर्माण होण्यास सुरुवात झाली होती; परंतु शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या समित्यांना बसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आजच्या स्थितीला तंटामुक्त समिती केवळ नामधारी राहिली असून त्याचे महत्त्वही कमी झाले आहे. या समित्याचे महत्त्व केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.

गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटवून आपल्या गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली.

दरम्यान आजच्या घडीला समित्या थंडबत्यात गुंडाळुन ठेवल्यासारखे वाटत आहे. जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्या तंटामुक्त समित्या सक्रिय आहेत. बऱ्याचशा समित्या या नावालाच असल्यामुळे शासनाच्या मूळ उद्येशालाच खिळ बसतेय की काय असा प्रश्न सर्व सामान्य जनतेसमोर उभा राहत आहे.

गावागावात क्षुल्लक कारणावरून होणारे तंटे, वाद, विवाद गावातच संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृद्धीकडे न्यावे असा या योजनेचा चांगला हेतू आहे. या योजनेसाठी लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली होती. ह्या योजनेला सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, गावागातील तंटामुक्त समित्या सक्रियप होत्या.

नाशिक जिल्ह्यात या समित्या पुन्हा सक्रिय झाल्यास गावातील तंटे कमी होतील व पोलिसांचा त्रासही वाचणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनानेही एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. समितीच्या अध्यक्षासह सदस्यांना विश्वासात घेत त्यांना मान, सन्मान दिल्यास आजही खेड्या पाड्यातील वाद विवाद हे गावातच मिटतील, यासाठी वरिष्ठांनी लक्ष घातल्यास या योजनेचा उदात हेतू खऱ्या अर्थाने सफल होईल यात शका नाही.

कोट...

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती हि गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून प्रवृत्त करणे यासाठी अस्तित्वात आली आहे. शासनाने तंटामुक्त गाव समितीला प्रोत्साहन देऊन स्व. आर. आर. पाटील यांच्या नावाने निवड झालेल्या तंटामुक्त गावात पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात यावा.

- कोंडाजी शिंदे, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, जळगाव नेऊर.