शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नागरी वाहतूक धोरणात खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यावर फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 2:06 PM

नाशिक महापालिकेत सादरीकरण : आयटीडीपीकडून सादरीकरण, शाश्वत वाहतुकीवर भर

ठळक मुद्देभविष्यात वाहनकेंद्रित धोरण राबविण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागणारदहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या महापालिकांना व त्यांच्या सभोवताली २० कि.मी. परिसरासाठी सदर धोरण लागू

नाशिक : शाश्वत वाहतुकीचा हिस्सा वाढविणे आणि खासगी वाहनांचा वापर कमी करत शहराची रचना सार्वजनिक वाहतुकीस अनुकूल करण्याची सूचना महाराष्ट शासनाने प्रसिद्ध केलेल्या नागरी वाहतूक धोरणाच्या मसुद्यात करण्यात आलेली आहे. या धोरणातील ठळक मुद्द्यांचे सादरीकरण शासनाने नियुक्त केलेल्या आयटीडीपी या संस्थेने शुक्रवारी (दि.२) महापालिका आयुक्तांच्या सभागृहात झालेल्या चर्चासत्रात केले.आयटीडीपी संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि प्रांजली देशपांडे यांनी शाश्वत वाहतुकीसाठी धोरणात सुचविलेल्या विविध मुद्द्यांचा ऊहापोह केला. भविष्यात वाहनकेंद्रित धोरण राबविण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागणार आहे. त्यासाठी उत्तम पदपथ, पादचारी पूल, सुरक्षित क्रॉसिंग, सायकल मार्ग, उत्तम बस, डेपो, स्थानके यासह बीआरटी व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे. दहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या महापालिकांना व त्यांच्या सभोवताली २० कि.मी. परिसरासाठी सदर धोरण लागू असणार आहे. त्यात प्रामुख्याने, शाश्वत वाहतुकीचा हिस्सा वाढविणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, ८० टक्के लोकवस्ती सार्वजनिक वाहतुकीपासून ५०० मीटरच्या टप्प्यात आणणे, अंध-अपंगांना नजरेसमोर ठेवत सुविधांचा रचना करणे, प्रदूषण कमी करणे, आर्थिक तरतुदींचा रोख बदलणे, विकास आराखड्यात सुधारणा करणे, पार्किंग पुरवण्यावर मर्यादा, प्रशासकीय सुधारणा करणे, अधिका-यांची तांत्रिक क्षमता वाढवणे, वाहतुकीचा सांख्यिकी आढावा घेणे, शाश्वत वाहतूक नियोजन विषयक अभ्यासक्रम ठरवणे आदी उपायोजना कराव्या लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी, महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्ण, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, राज्याच्या ट्रॅफिक सेलच्या संचालक सुलेखा वैजापूरकर, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर, शहर अभियंता उत्तम पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, एसटी महामंडळाच्या यामिनी जोशी, राजेंद्र जगताप, शहर वाहतूक शाखेचे श्रीनिवास चित्राव, उल्हास भोये, सहायक नगररचना संचालक आकाश बागुल आदी उपस्थित होते.माजी उपमहापौरांचा आक्षेपसादरीकरण सुरू होण्यापूर्वीच माजी उपमहापौर व नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी सदर धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या काय, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, याबाबत सुलेखा वैजापूरकर यांच्यासह आयटीडीपीचे प्रतिनिधी उत्तर देऊ शकले नाही. सदर धोरणाबाबत आधी जनतेची मते नोंदविणे गरजेचे असून, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून महासभेत जनतेची मते मांडणारच असल्याचे बग्गा यांनी सांगितले. यावेळी महापौरांनीही या धोरणाची प्रसिद्धी अपेक्षित होती, असे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी