शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

By admin | Updated: October 16, 2014 21:23 IST

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

!नाशिक : कोणी बिहारचे, कोणी गुजरातचे, कोणी पश्चिम बंगालचे, तर कोणी थेट नेपाळ, दक्षिण आफ्रिकेचे... नाना प्रांतांतली ही माणसे वर्षानुवर्षे आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहतात... तरीही दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि ते इतरांच्या चेहऱ्यावरही फुलवतात... कारण हे सारे सर्कसमधले कलावंत असतात आणि सर्कस हेच त्यांचे कुटुंब असते...नाशिकमध्ये महिनाभरापासून मुक्कामी असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमधील कलावंत आपल्या दिवाळीबद्दल दिलखुलासपणे सांगतात. देशभरात सध्या अवघ्या आठ मोठ्या सर्कस उरल्या असून, त्यांपैकी एक असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये १८० माणसे काम करतात. त्यांपैकी ७०-८० जण कलावंत, तर बाकीचे कामगार आहेत. त्यात पेंटर, सुतारापासून ते आचाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. सकाळी साडेपाच वाजता या सर्वांचा दिवस सुरू होतो. सरावानंतर नाश्ता, जेवण आणि दुपारी एक ते रात्री साडेनऊ या काळात तीन खेळ... अशी या सर्वांची दिनचर्या. सर्कस वर्षभरात साधारणत: आठ शहरे फिरते. प्रत्येक ठिकाणी एक ते दीड महिना मुक्काम असतो. प्रवास आणि तंबू उभारणीचा काळ वगळला तर जवळपास बाराही महिने सर्कस सुरू असते. कोणतेही कारण असो, सर्कस कधीच बंद राहत नाही. कारण ती बंद ठेवणे मालकासह कलावंतांनाही परवडणारे नसते. सर्कशीत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी सर्वच जाती-धर्मांची माणसे एकत्र राहतात. बहुतांश कलावंतांना वर्षभरातून, तर कित्येकांना तीन-तीन वर्षांतून एकदाच घरी जायला मिळते. त्यामुळे सर्कस हेच त्यांचे घर होते. तेथेच त्यांचे प्रेम जुळते आणि तेथेच लग्नेही होतात. दिवाळीत काही ठिकाणी फक्त दोनच दिवस सायंकाळचे शो बंद ठेवले जातात. अनेकदा तर सर्कस तेवढीही बंद नसते. त्यामुळे कलावंतांना खास दिवाळी साजरी वगैरे करायला वेळच मिळत नाही. सकाळच्या वेळेत मात्र जो-तो आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण साजरा करतो. सर्कशीच्या मालकाकडून त्यांना काही वाढीव पैसे, भेटवस्तू आणि मिठाई दिली जाते. दूरवर असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांकडूनही गोडधोड पाठवले जाते. सर्कशीचे तंबू कापडी असल्याने कलावंतांना फटाके मात्र फोडता येत नाहीत. प्रत्येक तंबूबाहेर आणि सर्कशीच्या प्रवेशद्वारावरही पणत्या लावल्या जातात. ज्याला वाटेल तो नवे कपडे घेतो. ज्याच्या-त्याच्या संस्कृतीनुसार पदार्थ तयार केले जातात. त्यांची चव प्रत्येकाला चाखायला मिळते... ‘सर्कशीच्या कंपाउंडच्या आत आम्हा सर्वांचा एकच धर्म असतो, तो म्हणजे कलावंताचा! त्यामुळे जात-धर्म कोणताही असो, दिवाळी सगळेच साजरी करतात’, असे इथले कलावंत अभिमानाने सांगतात. घरापासून दूर असलो, तरी त्याविषयी तक्रार नाही. कारण सर्कशीतली दिवाळी आम्हा सर्वांना अपार आनंद देऊन जाते. प्राण्यांचे खेळ बंद झाल्याने सर्कस आता फक्त कलावंतांच्या कसरतीवर सुरू आहे. पुढच्या काळात सर्कस बंद होण्याची भीती आहे. असे व्हायला नको.. कारण सर्कशीवरच आमचे पोट अवलंबून आहे’, असे काही जण पोटतिडकीने सांगतात. ‘अन्य समाजाकडून तुम्हा कलावंतांना काय अपेक्षा आहेत’, असे विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ‘बाकी काही नाही, फक्त सर्कस चालू राहायला हवी! यापलीकडे लोकांनी आमच्यासाठी काही करावे अशी अपेक्षा नाही... सुटी मिळत नसल्याचीही तक्रार नाही. कारण सर्कशीतले खेळ हाच आमचा श्वास आहे... आणि आपण श्वास घेणे कधी थांबवतो का?’ - आयुष्याची ‘सर्कस’ होऊनही त्याच सर्कशीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचे हे उद्गार किरकोळ बाबींवरून तक्रारीचा सूर आळवणाऱ्यांसाठी झणझणीत अंजनच असते!